मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्प सादर केला आहे. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी महिलांना चांगली भेट दिली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
1) महिला व बालविकास विभागासाठी मोठी तरतूद –
महिला आणि बालविकास विभागाला 2 हजार 247 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर केंद्राकडून महिला आणि बालविकास विभागाला 1 हजार 398 कोटी रूपये देण्यात येणार आहेत.
2) 12 वी पर्यंत विद्यार्थिनींना मोफत प्रवास –
विद्यार्थिनींना आपल्या गावातून शाळा, महाविद्यालयापर्यंत जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाद्वारे राज्यव्यापी योजनेची घोषणा.
3) राजमाता जिजाऊ गृस्वामिनी योजना –
महिलांच्या नावे घर करण्यात आले तर मुद्रांक शुल्कात 1 टक्का सूट. या योजनेचा लाभ 1 एप्रिल 2021 पासून घेता येणार आहे.
4) घरकाम महिलांसाठी खास योजना –
घरकाम करणाऱ्या महिलांसाठी संत जनाबाई सामाजिक सुरक्षा योजना. या योजनेसाठी समर्पित कल्याण निधी उभारण्यात येणार आहे. तर राज्य सरकारकडून या योजनेसाठी 250 कोटी रूपये जाहीर.