पाचगणी (सादिक सय्यद) : तब्बल ८ महिन्याच्या लाॅकडाऊननंतर जागतिक पर्यटनस्थळ व महाराष्ट्राचे नंदनवन पर्यटकांनी हाऊसफुल झाल्याचे बोलके चित्र दिवाळीच्या सुट्टीत पहायला मिळत आहे.
दिवाळीच्या सलग तीन दिवसांच्या सुट्टीत पर्यटकांनी आवडते ठिकाण म्हणून महाबळेश्वर व पाचगणीकडे आपला मोर्चा वळवला आहे. महाबळेश्वरचे मुख्य मार्केट रात्री पर्यटकांनी फुलून गेले होते.