नवी दिल्ली – भारतीय लोकशाहीचा सर्वांत मोठा सोहळा असणाऱ्या लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज पूर्णत्वास जाणार आहे. निवडणुकीतील अखेरच्या आणि सातव्या टप्प्यासाठी देशभरातील लोकसभेच्या 59 जागांसाठी मतदान पार पडले आहे.
लोकसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्यातील मतदान पडले असून संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत सरासरी एकूण 61.07 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर येत आहे.
6.30 वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी
बिहार – 53.20 %
हिमाचल प्रदेश – 66.60 %
मध्यप्रदेश – 69.36 %
पंजाब – 58.95 %
उत्तर प्रदेश – 55.47 %
पश्चिम बंगाल – 73.40 %
झारखंड – 70.77 %
चंडीगढ – 63.57 %
Take a look at the interim voter turnout today in #Phase7 of #LokSabhaElections2019 #GotInked #IndiaElections2019
(Updated till 6:30 PM) pic.twitter.com/hipjpqX5QK— Election Commission of India (@ECISVEEP) May 19, 2019
दरम्यान, आज अंतिम टप्प्यातील मतदानामध्ये पंजाबमधील सर्व 13 जागांसाठी मतदान पार पडले आहे. त्याशिवाय, उत्तरप्रदेश (13 जागा), पश्चिम बंगाल (9 जागा), बिहार आणि मध्य प्रदेश (प्रत्येकी 8 जागा), हिमाचल प्रदेश (4 जागा), झारखंडमध्ये (3 जागा), चंडीगढमध्ये 1 जागेसाठी मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे यादिवशी जाहीर होणार आहे. त्यामुळे मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली तरी निकालासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. साहजिकच, सगळ्यांचेच लक्ष मतदानोत्तर चाचण्यांच्या निष्कर्षांकडे असेल. अंतिम टप्प्याचे मतदान संपल्यानंतर लगेचच चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर करण्याची चढाओढ वृत्तवाहिन्यांमध्ये सुरू होईल. ते निष्कर्ष किंवा अंदाज खरे ठरणार का, ते प्रत्यक्ष निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल.