Sunetra Pawar Facebook Post । आगामी लोकसभा निवडणुकीची आज शनिवारी ३ च्या सुमारास घोषणा होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग 543 लोकसभा मतदारसंघांसाठीचा कार्यक्रम दुपारी तीन वाजता पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करणार आहे. त्यानुसार आज होणाऱ्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे. यंदाची लोकसभा निवडणूक ही 6 ते 7 टप्प्यात होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
अशात महाराष्ट्रातील बारामती मतदारसंघ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. कारणही तसेच आहे, राज्यात या निवडणुकीत सर्वात रोमांचकारी लढत बारामती लोकसभा मतदारसंघात होणार असल्याचे दिसत आहे. कारण विद्यामान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अशात सुनेत्रा पवारांची एक फेसबुक पोस्ट चर्चेत आहे.
Sunetra Pawar Facebook Post । काय आहे सुनेत्रा पवार यांची पोस्ट ?
“समाजाच्या शेवटच्या घटकाकडूनही गजर घडाळ्याचाच”
माळेगावमधून बाहेर पडल्यानंतर साईनगर येथे रस्त्याच्या कडेला बरेच लोक उभे होते. आधी काहीच कल्पना नव्हती. मात्र तरीही हे लोक बहुदा आपल्यालाच भेटण्यासाठी थांबले असतील अशी शक्यता वाटली आणि गाडी थांबवली. भटके जोशी समाज संघटनेचे ते पदाधिकारी, कार्यकर्ते होते. या समाज बांधवांना मी माळेगावात आल्याचे समजल्याने ते मलाच भेटायला गावात येत होते. मात्र वाटेतच भेट झाली.
ही सर्व मंडळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून आजपर्यंत कशी मदत झाली ते अगदी भरभरून आनंदी चेहऱ्याने सांगत होते. कोरोना काळात तर दादांनी फक्त त्यांनाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील त्यांच्या अनेक समाज बांधवांना भक्कम आधार दिल्याचे सांगितले. ते बोलत असताना मी गाडीतून उतरू लागले तर म्हटले, ‘नका त्रास घेऊ आत्ता. आम्हाला दादांनी आमच्यासाठी काय केलं तेवढंच तुम्हाला सांगायचं होतं. आम्ही सर्वजण तुमच्याच सोबत आहे, रामनवमीच्या कार्यक्रमाला मात्र नक्की यायचं तुम्ही. निमंत्रण घेऊन येतोच’, असे आग्रहाने सांगितले.
नक्की येईन, असं मनापासून त्यांना सांगितलं आणि निघाले. आज अवघ्या काही वेळात केवढ्या वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या घटकातील जनतेचे राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा यांच्यावरील प्रेम, विश्वास आणि हक्क दिसून आला. दिवसाचे सोळा – अठरा तास हा माणूस अक्षरशः राबतोय, झिजतोय ते कशाप्रकारे रुजलंय याचं दर्शन शेती, उद्योग क्षेत्रात असणाऱ्या चव्हाण कुटुंबियांच्या वस्तीवर झालं, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या माहेरचे वंशज राजे जाधवराव यांच्या वाड्यात झालंच आणि परतताना वाटेत जोशी समाज बांधव भेटून रस्त्यावर देखील झालं. राष्ट्रवादीवरील हे प्रेम व्यक्त केल्याबद्दल भगवान गोंडे, शेखर गोंडे, संतोष सुपेकर, गौरव साळुंखे, अरुण गोंडे, अमर गोंडे, धीरज पवार आदी बंधू, भगिनी या सर्वांचे मनापासून आभार.
हे वाचाल का ? ‘के कविता’कडे आहे, कोट्यवधींची मालमत्ता ? दारू घोटाळ्याशी ‘नाव’ कसे जोडले गेले वाचाच