Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा ‘संकल्प पत्र’ हा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘मोफत रेशन योजना पुढील 5 वर्षे सुरू राहील याची मोदींची हमी आहे.’
संपूर्ण देश भाजपच्या ‘संकल्प पत्र’ची वाट पाहत आहे. त्यामागचे एक मोठे कारण म्हणजे गेल्या 10 वर्षात भाजपने आपल्या जाहीरनाम्यातील प्रत्येक मुद्द्याला हमीभाव म्हणून अमलात आणले आहे. हे ‘संकल्प पत्र’ विकसित भारताच्या सर्व 4 मजबूत स्तंभांना – तरुण, महिला, गरीब आणि शेतकरी…’ मोदी यांनी यावेळी शेतकऱ्यांसाठी भाजप पक्ष कुठल्या हमी देणार आहे याबाबतही सांगितले आहे.
नैसर्गिक शेतीवर भर दिला जाईल
मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी नैसर्गिक शेतीवर भर दिला जाईल. भारताने क्रांतिकारी कार्य सुरू केले असून त्यात यशही मिळाले आहे. नॅनो युरियावर भर दिला जाणार आहे. शेतकरी समृद्धी केंद्रे विकसित केली जातील. फूड प्रोसेसिंग हब तयार करण्याचा संकल्प आहे. लाभ होतील आणि रोजगार निर्माण होईल. हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे नवीन इंजिन बनतील.
किसान सन्मान निधी लाभ सुरूच राहतील
भाजपनेच पशुपालक आणि मच्छीमारांना किसान क्रेडिट कार्डच्या कक्षेत समाविष्ट केले आहे. भविष्यातही देशातील 10 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीचा लाभ मिळेल.
हे वाचले का ? “रोजगाराची गॅरंटी, महिला आरक्षण, जगभरात रामायण उत्सव”; वाचा भाजपच्या संकल्प पत्रातील पाच मोठ्या गोष्टी