Lok Sabha Election 2024 । महाराष्ट्रातील महायुतीत लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपावरून मतभेद सुरु आहेत. राज्यातील ४८ जागांपैकी ३२ जागांवर दावा केला आहे. तर दुसरीकडे शिंदे आणि अजित पवार गटाने समसमान जागांची मागणी केलीय. त्यामूळे हा पेच निर्माण झालाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील नुकतेच राज्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या जागांच्या मागणीवर चर्चा झाली. मात्र, या बैठकीत जागावाटपाबाबत एकमत होऊ शकले नसल्याचे सूत्राने सांगितले.
हा पेच सोडणवण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्लीत बैठकीसाठी दाखल झाले आहेत. दिल्लीतील अमित शाह यांच्या बंगल्यावर जागावाटपाबाबत रात्री बैठक होणार आहे. या बैठकीत भाजपचे ज्येष्ठ नेते सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे. नुकतीच महाराष्ट्रातील भाजपच्या प्रमुख नेत्यांची नुकतीच दिल्लीत पक्षाच्या हायकमांडशी चर्चा झाली. या बैठकीत कोणत्या जागेवर कुणाला उमेदवारी द्यायची याबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर आज एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाला कोणत्या आणि किती जागा दिल्या जातील? याबाबत अंतिम निर्णय होणार आहे.
दरम्यान शिंदे गटानेही १३ जागांची मागणी केली असली तरी दहापेक्षा जास्त जागा देण्यास भाजप अनुकुल नसल्याचे समजते. शिवाय, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड, संभाजीनगर, ठाणे अशा काही मतदारसंघांवर शिंदे गट तसेच भाजपनेही दावा केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जागावाटपाची गुंतागुत वाढली आहे. आज हा जागावाटपाचा गुंता सुटणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही माध्यमांशी बोलतांना सांगितले होते की,’महायुतीतील जागावाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. प्राथमिक चर्चा सकारात्मक झालीय. ११ ते १२ मार्चपर्यंत जागावाटपाचा निर्णय होईल. पंतप्रधान नरेंद्र यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या ४५ लोकसभा मोदी. जागा कशा जिंकायच्या याशिवाय कोणताही फॉर्म्युला नाही. तिन्ही पक्ष त्यांच्या विजयासाठी एकत्र काम करतील.” असेही ते म्हणाले होते.
हेही वाचा
मनोज जरांगे यांचं लोकसभा निवडणुकीबाबत म्हणाले,’मराठे फॉर्म भरत आहे त्यांची फजिती होणार…’