मुंबई – कोविड-19 आजारामुळे भारतातील मोठ्या 75 कंपन्यांच्या ब्रॅंड मूल्यात या वर्षी 6 टक्के घट होऊन ब्रॅंड मूल्य 216 अब्ज डॉलरवर आले आहे. कंपन्यांनी जाहिरातीवरील खर्च कमी केला आहे.
यावर्षी महसूल कमी होणार असल्यामुळे आगामी वर्षातही ब्रॅंड मूल्य वाढविण्याबाबत कंपन्या कमी खर्च करण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे या काळात जगातील शंभर मोठ्या कंपन्यांच्या ब्रॅंड मूल्यामध्ये 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ब्रॅंड मूल्यात भारतामध्ये पहिल्या क्रमांकावर एचडीएफसी दुसऱ्या क्रमांकावर एलआयसी आहे. या यादीत चौथ्या क्रमांकावर भारती एअरटेल, सातव्या क्रमांकावर रिलायन्स जिओ, आठव्या क्रमांकावर फ्लिपकार्ट, नवव्या क्रमांकावर पेटीएम आहे.
या सर्वच कंपन्यांच्या ब्रॅंड मूल्यावर या वर्षात परिणाम झाला असल्याचे यासंदर्भातील मूल्यांकन करणाऱ्या जागतिक संस्थेने म्हटले आहे. भारतातील बऱ्याच कंपन्या आता जागतिक व्यासपीठावर काम करू लागल्या आहेत.