Farmer Success Story : कोविडचा काळ हा बऱ्याच लोकांसाठी सर्वात वाईट काळ होता, परंतु अनेकांनी त्याचे संधीत रूपांतर केले. एरवी गावातील लोक शेती सोडून नोकरीसाठी शहरात जात होते. पण कोविडच्या काळात कोणताही उपाय दिसत नसताना अभ्यास आणि लेखन करून अनेकांनी पुन्हा शेतीच्या कामाला सुरुवात केली. त्यापैकीच एक म्हणजे राजेश रंजन. इंजिनीअर झाल्यानंतर त्यांनी अनेक नोकऱ्या केल्या शेवटी ते गावी परतले. त्यानंतर त्यांनी गुगल आणि सरकारच्या मदतीने पॉलिहाऊस बांधले.
सरकारी मदतीमुळे नशीब बदलले
शेतकरी राजेश यांनी सांगितले की, जेव्हा ते शहरातून परतले तेव्हा त्यांनी पाहिले की येथील शेतकरी खूप मेहनती आहेत आणि जमीन देखील खूप सुपीक आहे. फक्त इथे आधुनिक तंत्रज्ञानाची आणि योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. पंतप्रधान योजनेचा लाभ घेत राजेशने एफपीओ स्थापन केला आणि यामध्ये त्याला फलोत्पादन विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि कृषी विभागाचे पूर्ण सहकार्य मिळाले. त्यांनी त्यांच्या गावात पॉलीहाऊस बांधले आणि त्यात टोमॅटोची लागवड केली, त्यात त्यांना चांगला नफा मिळत आहे.
पॉलीहाऊसमध्ये 600 झाडे लावली
राजेश रंजन हे जमशेदपूरच्या लोडीह या छोट्या गावात राहतात.शेतकरी राजेश यांनी त्यांच्या पॉलीहाऊसमध्ये 600 रोपे लावली आहेत. ही झाडे 8 फूट ते 12 फूट उंचीची असून 250 ते 300 किलो टोमॅटोचे उत्पादन काढत होते. सुरुवातीला बाजारभाव मिळाल्याने त्यांनी ६० रुपये किलोने टोमॅटो विकला. आता जिथे इतर टोमॅटोचा भाव १० ते १२ रुपये आहे तिथे तो १५ रुपये किलोने टोमॅटो विकतात. यामुळे त्यांनी पहिल्याच हंगामातच 80 हजार रुपयांची कमाई केली होती.त्यानंतर त्यांही गुणवत्ता टिकवून ठेवत आणखी रोपे वाढवली ज्यामुळे त्यांचे वार्षिक उत्पन्न बारा लाखांच्या आसपास पोहचले आहे.
पॉलीहाऊसची साथ आणि तंत्रज्ञान
राजेश सांगतात नोकरी सोडल्यानंतर गुगल आणि इतर ठिकाणी मार्गदर्शन घेऊन सुरुवात केली. सुरुवातीला काही अंदाज चुकले देखील मात्र त्यानंतर व्यवस्थित अंदाज आल्यानंतर मालाची क्वांटिटी वाढवण्यासाठी हालचाल केली आणि यश मिळालं. सरकारी योजनांचा फायदा करून घेतला. बाजारभाव योग्य न मिळाल्याने कधीकधी तोटाही सहन करावा लागला मात्र त्यावरही काही पर्याय मिळू शकतो का याचे प्रयत्न सुरु असल्याचे राजेश यांनी यावेळी स्पष्ट केले.