Yuvraj Singh । असं म्हणतात माणसाने नेहमी काही तरी नवीन केलं पाहिजे. नवीन शिकले पाहिजे. कारण यातून माणसाच्या प्रगतीचा मार्ग मिळतो. हीच म्हण सध्या एका प्रयोगशील आणि यशस्वी शेतकऱ्याच्या बाबती लागू होत असल्याचे दिसत आहे. या शेतकऱ्याने आपल्या वडिलोपार्जित शेतीचा अशा पद्धतीने उपयोग करून घेतला, कि त्याच्यामुळे त्याला लाखो रुपयांचा फायदा झाला. आजच्या success story च्या भागात अशाच एका प्रयोगशील शेतकऱ्याची कहाणी आपण जाणून घेणार आहोत.
मध्य प्रदेशातील अलीराजपूर येथील एका शेतकऱ्याने शेतीला फायदेशीर व्यवसाय करून सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी आपल्या वडिलोपार्जित बागेचा विस्तार करून आंब्याची बाग तयार केली आहे. त्यांच्या बागेची विशेष बाब म्हणजे त्यांच्या बागेत विविध प्रकारच्या २६ जातींच्या आंब्याची झाडे लावली आहेत. मध्य प्रदेशातील अलिराजपूर जिल्ह्यातील छोटा उंडवा गावातील शेतकरी युवराज सिंग यांनी हा प्रयोग केला आहे.
बागेत 500 आंब्याची रोपे लावली Yuvraj Singh ।
युवराज सिंग यांनी आपल्या या प्रयोगाविषयी आणि शेतीच्या कामाविषयी त्यांच्या वडिलांकडून आणि आजोबांकडून प्रेरणा घेतलीय. लहानपणापासून त्यांनी आजोबा आणि वडिलांना नेहमीच आंब्याच्या बागेत काम करताना पाहिले आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी 7 वर्षांपूर्वी बागेत 500 आंब्याची रोपे लावली. यामध्ये केशर व इतर आंब्याची एकूण २ हजारांहून अधिक झाडे आहेत. त्यांनी वडिलोपार्जित शेती तर टिकवली आहेच सोबत आपल्या काही कल्पनांचा वापर करून शेतीला आधुनिकतेची जोड दिलीय.
त्यांनी या प्रयोगातून त्यांच्या बागेत लंगडा, केसर, चौसा, सिंदूरी, राजापुरी, हापूस आदी आंब्यांच्या प्रजातींची लागवड केली. दरम्यान, देशातील विविध शहरांमध्ये झालेल्या आंबा महोत्सवात गेल्या 10 वर्षांत अनेक वेळा त्यांनी प्रथम पारितोषिक मिळवले आहे.
अलीराजपूर जिल्ह्यातील जमिनीत ओलावा असल्याने आंबा लागवडीसाठी योग्य आहे. इथे पिकणाऱ्या आंब्याच्या चवीला संपूर्ण देशात एक खास ओळख आहे. याविषयी युवराज यांनी माहिती देताना, दरवर्षी मी माझ्या शेतातून वेगवेगळ्या जातीचे आंबे विकतो.असे म्हटले. अलीराजपूर आंब्याचे वैशिष्ट्य यावरूनही कळू शकते की लोक हंगामापूर्वीच आंब्याची ऍडव्हान्स बुकिंग करून पैसे देतात.
नूरजहानची किंमत 1000 रुपये प्रति किलो Yuvraj Singh ।
युवराज यांनी मागील काही वर्षात त्यांच्या शेतीत नवीन प्रयोग केला आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी जिल्ह्यातील काठीवाड्यातून कलम करून ‘नूरजहाँ’ नावाच्या आंब्याचे रोप आणले होते. ते त्यांनी त्यांच्या बागेत लावले आणि आज एका छोट्याशा रोपाचे आंब्याचे झाड झाले आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे एका आंब्याचे वजन सुमारे तीन किलो आहे, ज्याची किंमत 1000 रुपये प्रति किलो आहे.त्याची मागणी देखील बाजारात खूप आहे.
4 ते 5 लाख रुपयांची ऑनलाइन विक्री
दरम्यान, या प्रयोगशील शेतीतून त्यांनी गेल्या वर्षी हंगामात चार ते पाच लाख रुपयांचे आंबे फक्त ऑनलाइन मार्केटद्वारे विक्री केलीय. याशिवाय त्यांनी 5 किलोचे बॉक्स तयार करून आंबे थेट बाजारात आणि इतर लोकांना विकले आहेत. अलीराजपूर हा आदिवासी भाग असल्याने येथील लोकांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आंबा आहे. अलीराजपूरमध्ये मोठी बाजारपेठ असल्याने नागरिकांना आंबा विकण्यासाठी शहराबाहेर जावे लागत नाही. तरीदेखील त्यांनी या ठिकाणी प्रयोग करून देशातील इतर शेतकऱ्यांना याची प्रेरणा दिली आहे.