लाखणगाव -आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काठापूर, लाखणगाव, देवगाव, पोंदेवाडी परिसरात गुरुवारी सायंकाळी दीड तास झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. काढून ठेवलेल्या बाजरीच्या कणसात पाणी घुसल्याने बाजरीचे नुकसान झाले आहे.
ऊस, कडवळ, तरकारी अशी अनेक पिके पावसाच्या पाण्यामुळे बाधित झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पिकांमध्ये गुडघाभर पाणी साचले आहे. नुकसानभरपाईची मागणी आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी केली आहे.