मंचर-पारगाव (पेठ, ता. आंबेगाव) येथील जाधववस्ती येथील शेतकऱ्यांचे गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे घर, पत्राशेड, कांद्याच्या बराकींचे नुकसान झाले आहे.
सातगाव पठार परिसरात सायंकाळी साडेसहादरम्यान अनेक गावांमध्ये पाऊस झाला. उद्योजक भाऊसाहेब सावंत पाटील यांचे पत्राशेड, शेजारील शेतकऱ्यांची सात घरांचे व दोन कांदाचाळींचे नुकसान झाले आहे. भिंती पडल्याने नुकसान झाले आहे. पंचनामे करून नुकसानभरपाईची मागणी भाऊसाहेब सावंत पाटील यांनी केली आहे.