कोपरगाव- जिल्ह्याच्या पोलीस दलात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाचा दबदबा अधिक असतो. अतिशय जबाबदारीचे हे पद असल्याने गेल्या अनेक दिवसापासून रिक्त झालल्या या पदावर कोणाची वर्णी लागते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. काही पोलीस अधिकारी या पदासाठी आपलं वजन वापरत होते. मात्र जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांची अचानक स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षक पदी नियुक्ती करून सर्वांना चकीत केले आहे. शांत,मितभाषी,अभ्यासु , कर्तव्यदक्ष निष्कलंक अशी छबी असलेले पोलीस निरीक्षक अनिल कटके यांची ओळख जिल्ह्यात असल्याने अधिक्षक पाटील यांनी कटके यांना प्राधान्य दिले आहे.
सध्या जिल्ह्यातील पोलीस दलतात वादग्रस्त वातावरणात निर्माण झाले आहे.हप्तेखोरीची उघड चर्चा झाल्याने जिल्ह्यात काही पोलीस अधिकाऱ्यांची प्रतिमि मलीन झाली. काही अधिकारी या बदलत्या वातावरणात आपली बदनामी होवू नये म्हणून स्वतः जिल्हा बदली करुन गेले. अशा मलीन झालेल्या वितावणात बदल घडविण्यासाठी
मनोज पाटील यांनी अनिल कटके यांची स्थानिक गुन्हे शाखेत बदली केली असावी अशी पोलीस वर्तुळात चर्चा आहे. गेल्या काही महीण्यापासुन जिल्हा पोलीस बदनामीच्या चक्रव्यूहात अडकत आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने हप्तेखोरीची चर्चा उघडपणे केली त्याची क्लीप जिल्हाभर पसरल्याने त्याची तातडीने उचलबांगडी करावी लागली. जिल्ह्यातील भेसळयुक्त डिझेल , अवैद्य गुटखा असे मोठे प्रकरणे उघडकीस निघाले त्यात जिल्ह्यातील अवैद्य व्यवसायाची मालीका सुरू आहे. अशा स्थितीत स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार वादग्रस्त अधिकाऱ्याकडे दिल्यास जिल्ह्यातील राजकीय नेत्यांचा रोष वाढण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींचा सखोल विचार करुन कदाचित पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी अनिल कटके यांना ही संधी देत पोलीस दलाला अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, पोलीस निरीक्षक अनिल कटके यांची स्थानिक गुन्हे शाखेत बदली झाल्याने कोपरगावच्या शहर व तालुका पोलीस स्टेशनला कोण येणार याकडे लक्ष लागले आहे.काही दिवसापुर्वी शहरचे राकेश मानगावकर यांची नगरला बदली झाली त्यांच्या जागी कोणीच आले नाही आता तालुका पोलीस स्टेशन चे कटके यांची बदली झाली त्यांच्या जागी कोणी आले नाही. अतिशय संवेदनशील असलेला हा तालुका आहे.
तालुक्यात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मारामारी, अवैद्य व्यवसाय छुप्या पध्दतीने सुरु आहेत अशातच दोन्ही पोलीस स्टेशनला पोलीस अधिकारी नसल्याने चोरांना संधी अधिक मिळणार. जर शहर व तालुका पोलीस स्टेशनला पुर्व अनुभव असलेले अधिकारी आले तर तालुक्यातील गुन्हेगारीवर आळा बसण्याची शक्यता अधिक आहे. तालुक्यातील गुन्हेगारांची कुंडली त्यांना जवळून माहीत आहे
नव्या अधिकाऱ्याला ओळखी करण्यात अधिक वेळ जावू शकतो.