कोल्हापूर (प्रतिनिधी) – संपूर्ण देश आज कोरोनाच्या दुस-या लाटेचा सामना करत आहे. गेली दीड वर्षे अशा संकट काळामध्ये संपुर्ण अर्थव्यवस्था कोलमड़ली असून सर्वच क्षेत्राला याची झळ पोचली आहे. कोल्हापूर जिल्ह्याची सध्याची परिस्थिती पाहता हा जिल्हा कोरोनाचे देशातील सर्वाधीक रुग्ण असलेला जिल्हा बनला आहे. या गंभीर प्रसंगी प्रशासनाच्या वतीने लॉकडाउनचे निर्बंध कडक केले आहेत. लॉकडाऊनचे निर्बंध लावताना एमआयडीसी (MIDC) क्षेत्राचा या बंद काळातील होणा-या नुकसानीचा विचार प्रशासनाच्यावतीने केला गेला नाही.
आज लॉकडाऊन मुळे कोल्हापूर मधील पंचतारांकित कागल, गोकुळ शिरगांव तसेच शिरोली एमआयडीसी (MIDC) दिनांक 16 मे पासून 23 मे पर्यंत पुर्णपणे बंद आहेत. या कालावधीत उच्चदाब वीज ग्राहकांना याचा फारच तोटा सहन करावा लागणार आहे. कारण किमान आकार हा Rs. 411 per KVA per month असा असतो. उदाहरणार्थ 2000 kva have to pay Rs. 8,22,000 as a fix charges, याचा अर्थ 8 ते 10 दिवस कारखाने बंद ठेवून पुर्ण 26 दिवसासाठी किमान आकार भरावा लागणार आहे.
त्यामुळे वरील बाबीसाठी आज भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य यांना ईमेल द्वारे कोल्हापूर जिल्ह्यातील एमआयडीसी (MIDC) क्षेत्रातील उद्योजक वीज ग्राहकांच्या वतीने मागणी करण्यात आली की, कोल्हापूर जिल्ह्यात 16 मे पासून 23 मे 2021 पर्यंत प्रशासनाच्या वतीने केलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर या बंद काळातील एमआयडीसी (MIDC) क्षेत्रातील ग्राहकांचा तोट्याचा किंवा नाहक भरावा लागणार विजेचा किमान आकार रद्द करुन या ग्राहकांना दिलासा द्यावा.