आ. निलेश लंकेसह पाचशे लोकांचे दिल्लीत पवारांना साकडे
पारनेर – के.के. रेंज प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार नीलेश लंके यांनी तब्बल पाचशे पारनेरकरांना दिल्लीत नेवून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहा जनपथ या त्यांच्या निवासस्थानी भेट घेवून साकडे घातले. केंद्र सरकारला यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यास भाग पाडू असे आश्वासन यावेळी पवार यांनी दिले.
पारनेर नगर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न गंभीर असून येत्या काही दिवसात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यांसमवेत पिंपळगाव जोगा, मुळा धरणासह इतर कुठल्या धरणावरून पाणी आणता येईल, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. पारनेर नगर तालुक्याच्या पाणी प्रश्नावर चर्चा करणार असून पारनेर नगर व राहुरी तालुक्यातील किमान 23 गावावर आलेले के.के.रेंजचे संकट दूर करण्यासाठी व सरकारला सकारात्मक निर्णय घेण्यास भाग पाडणार असेही पवार म्हणाले.
दिल्लीसारख्या ठिकाणी साडेचारशे ते पाचशे लोक घेऊन फिरणारा आमदार यापुढील काळात महाराष्ट्रात एक नवीन इतिहास तयार करेल असे गौरवोद्गार पवार यांनी केले. खासदार सुप्रिया सुळे यांनी देशाच्या संसदेमध्ये कांदा प्रश्न संदर्भात चर्चा केली व संसदेत अधिवेशनामध्ये आ. लंके यांनी कांदाप्रश्ना संदर्भात निर्माण केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की आज हा कांदा प्रश्न नक्कीच चर्चेत आणणार आहे. एक तास पारनेर नगर तालुक्यातून गेलेले सर्व के.के. रेंज बाधित शेतकरी यांच्याशी शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी सविस्तर चर्चा केली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य धनंजय गाडे, राजेंद्र चौधरी, बापु शिर्के, विजय औटी, डॉ. कावरे, श्रीकांत चौरे, सरपंच राहुल झावरे, गणेश साठे, अरूण पवार, सचिन पठारे, किशोर गाडे, श्रीकांत पवार, बापू रोहकले, संदीप सालके, दत्ता कोरडे, संतोष ढवळे, बलभीम कुबडे, सुरज भुजबळ, संभाजी आढाव, पोपट पिसाळ, शरद चौधरी, जयसिंग जरड, प्रमोद साठे, नंदु सोंडकर, दत्ता निवडूंगे, सोपान मते, भाऊ ठूबे, तान्हाजी आचार्य, सागर मते, पप्पु कावरे, प्राविण थोरात, स्वप्निल कावरेसह पारनेर नगर तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.