नवी दिल्ली – “कोविड-19′ अर्थात “करोना’ व्हायरसच्या प्रभावामुळे जगभरच्या सर्वच क्रीडा स्पर्धांना फटका बसला आहे. चीनसह जगभरात पसरलेल्या करोना विषाणूंच्या प्रभावामुळे तसेच धोक्यामुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा एकतर पुढे ढकलण्यात आल्या आहेत किंवा रद्द झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रिय क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी भारतीय खेळाडूंना घाबरुन न जाता सरावावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन केले आहे.
Due to coronavirus, sporting events and competitions are postponed temporarily but I appeal all our athletes not to lose the spirit, keep practicing and focus on your training… pic.twitter.com/UVSONEO5Wh
— Kiren Rijiju (@KirenRijiju) March 16, 2020
किरण रिजिजू यांनी ट्विट करताना म्हटले आहे की, “करोनाच्या धोक्यामुळे देशभरातील सर्व क्रीडा स्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे खेळाडूंनी घाबरुन न जाता सरावावर लक्ष केंद्रित करावे. सक्तीची विश्रांती मिळाली असली तरी ती खेळाडूंच्या पथ्यावरच पडेल व आगामी स्पर्धांसाठी खेळाडू पूर्ण सज्ज होऊन मैदानात उतरतील”.