रायगड – खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. तसेच परिसरात अनेक लोक अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहेइर्शाळवाडी दुर्घटनेच्या ठिकाणी एनडीआरएफ २ पथके पोहचली आहेत. गावात जाण्यासाठी रस्ता नाही. सुमारे १७ घरावर दरड कोसळली आहे. दोन भागात. आणखी दोन पथके पोहोचतील. गावात जाण्यासाठी पायवाट असल्याने मदत साहित्य पोहचण्यास उशीर होत आहे. आणखी दोन पथके पोहचली आहे.
दरम्यान, या घटनास्थळी अनेक स्थानिकांनी आपला जीव वाचवला आहे. घटनास्थळी नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. येथे १० ते २० फिट ठिगारा असल्याचे ndrf कडून सांगण्यात येत आहे. अद्याप 100 ते 120 जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. घटनेत सुदैवानं बचावलेल्या तरुणांनी आपला अनुभव माध्यमांशी बोलतांना सांगितला आहे. या घटनेत सुदैवानं बचावलेल्या तरुणांनी घटनेचा थरारक अनुभव सांगितलं. ते माध्यमांशी बोलतांना म्हणाले,’येथील 6 तरुण ही शाळेत रात्री साडेदहा ते 11 च्या दरम्यान झोपण्यासाठी गेली होती. यादरम्यान रात्रीच्या काळोख्यात मोठ्ठा आवाज झाला. दरड कोसळल्याचा आवाज शाळेतील तरुणांनी ऐकला त्यानंतर ते सर्व धावत डोंगराच्या पायथ्याशी आले.
मात्र या सर्व तरुणांचे आई-वडील कुटुंबिय या मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. आपल्या कुटुंबियांच्या काळजीनं बचावलेल्या तरुणांना अश्रू अनावर झाले आहे. रेस्क्यू ऑपरेशन करणाऱ्या जवानांकडे हे तरुण सातत्यानं आपल्या आप्टेष्टांबाबत विचारणा करत आहेत. दरम्यान, झोपण्यासाठी रात्री शाळेत गेल्यामुळे काही तरुण सुदैवानं बचावले, पण त्यांचे कुटुंबिय मात्र बेपत्ता आहेत. जीवाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेनं अख्खा महाराष्ट्र हादरला आहे.