नवी दिल्ली – थेट आणि आक्रमक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले भाजपा खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वामी सातत्याने मोदी सरकारवर टीका करत आहेत. आता त्यांनी पाकिस्तानच्या प्रश्नावर सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.
नुकतच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी मंगळवारी 23 मार्चला भारताचे शेजारील राष्ट्र पाकिस्तानचा राष्ट्रीय दिन होता यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना शुभेच्छा संदेश पाठवला होता. आता याच मुद्यावरून भाजपा खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ‘काश्मीर मुद्यावर शरणागती. गुडबाय पीओके. मला खात्री आहे की मोदी लवकरच इम्रान खानसोबत लंडनमध्ये जेवण करतील.’ असं ट्विट स्वामींनी केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वामी अनेकदा मोदी सरकारवर टीका करत आहेत. आता त्यांनी पाकिस्तानच्या प्रश्नावर सरकारवर संधान साधले आहे.