ananya panday -अनन्या पांडे ही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. स्टार किड असूनही ती आज आपल्या चित्रपटांमुळे इंडस्ट्रीचा एक प्रसिद्ध चेहरा आहे. अभिनयासोबतच अभिनेत्री तिच्या फॅशन सेन्ससाठी देखील चर्चेत असते. सध्या ती आदित्य रॉय कपूरसोबतच्या अफेअरच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. अलीकडेच अनन्याने तिच्या अभिनय पदार्पणाबद्दल खुलासा केला आहे.
अलीकडेच जेद्दाह येथील रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केल्याबद्दल अनन्याचा गौरव करण्यात आला. यादरम्यान तिने वृत्तमाध्यमांशी संवाद साधला. अनन्याने आपल्या अभिनय कारकिर्दीबद्दलही अनेक गोष्टी सांगितल्या. इतकंच नाही तर ती अभिनेत्री नसती तर काय करत असती हेही तिने सांगितलं.
अनन्या पांडेने सांगितले की, ‘करण जोहर हाच व्यक्ती होता ज्याने तिला तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करण्यात मोटिवेट केले. पुढे, अभिनेत्रीने संजय लीला भन्सासी यांच्यासोबत चित्रपट करण्याची इच्छा असल्याचेही सांगितले. त्याचवेळी जेव्हा अनन्याला विचारण्यात आले की असे कोणते चित्रपट आहेत ज्यांनी तिला अभिनय करण्यास प्रवृत्त केले? त्यावर तिने कभी खुशी कभी गम आणि कुछ कुछ होता है असे नाव घेतले.’
तिने हे देखील सांगितले की, ‘ती अभिनेत्री नसती तर ती कशी असती. तिने अभिनयाच्या जगात प्रवेश केला नसता तर जीवशास्त्र आणि तिच्या कौटुंबिक वैद्यकीय पार्श्वभूमीने प्रेरित होऊन वैद्यकीय क्षेत्रात काम केले असते, असे तिने सांगितले. याशिवाय अनन्याने सांगितले की तिला मुलांची खूप आवड आहे त्यामुळे तिला प्रीस्कूल टीचर बनायचे होते.’