मुंबई – मागील काही महिन्यांपासून प्रचंड उलथापालथी अनुभवणाऱ्या महाराष्ट्रातील राजकारणात शुक्रवारी अत्यंत महत्वपूर्ण आणि निर्णायक घडामोड घडली. शिवसेनेवर हक्क कुणाचा, या कळीच्या मुद्द्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने अंतिम निर्णय दिला. आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील असणारी शिंदे गटावर खरी शिवसेना म्हणून शिक्कामोर्तब केले. तसेच, धनुष्यबाण हे चिन्ह देखील शिंदे गटाला बहाल केले.
त्यानंतर आता सुप्रीम कोर्टात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे खटल्यावर युक्तिवाद सुरु आहेत. कोर्टाने सर्वात आधी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांना युक्तिवाद करायला सांगितल आहे.
आज गुरुवारी झालेल्या युक्तिवादात कपिल सिब्बल यांनी राज्यपाल, विधानसभा अध्यक्षांचे अधिकार तसेच बहुमत चाचणीतील आकडेवारीवरून जोरदार युक्तिवाद केला. कपिल सिब्बल म्हणाले,’मी इथे या खटल्यासाठी उभा आहे. हरेन किंवा जिंकेन माहिती नाही. मात्र घटनात्मक सार्वभौमत्त्व हे आमच्या हृदयाशी अगदी जवळचे आहे. त्याच्या संरक्षणासाठी मी इथे आहे. घटनात्मक प्रक्रियेचा बचाव होईल, याची सुनिश्चितता करण्यासाठी मी इथे आहे. मात्र कोर्टाने सदर घटनाक्रमाला परवानगी दिली तर १९५० पासून आपण टिकवून ठेवलेल्या लोकशाहीचा अंत होईल…’