Kangana Ranaut Lok Sabha Elections| भाजपकडून लोकसभेच्या उमेदवारांची पाचवी यादी आज जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील तीन जागांचा समावेश करण्यात आला आहे. भाजपने या यादीत 111 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून त्यात नवीन जिंदाल आणि कंगना यांचा देखील समावेश आहे.भाजपने हिमाचल प्रदेशातील मंडी येथून अभिनेत्री कंगनाला राणावतला तिकीट दिले आहे. या
मागील अनेक दिवसांपासून अभिनेत्री कंगना निवडणूकीच्या रिंगणात उतरणार अशी चर्चा होती. अखेर काल यावर शिक्कामोर्तब झाला. भाजपाने काल रविवारी जाहीर केलेल्या यादीत ते स्पष्ट झाले आहे. लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कंगणाने सोशल मीडियाद्वारे पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
कंगणाची पहिली प्रतिक्रिया Kangana Ranaut Lok Sabha Elections|
कंगनाने लिहिले की, “माझा प्रिय भारत देश आणि भारतीय जनतेचा स्वत:चा पक्ष भारतीय जनता पार्टी ज्याचं मी नेहमीच समर्थन केले. आज भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने मला माझी जन्मभूमी मंडी हिमाचल प्रदेश मतदारसंघातून लोकभा उमेदवार म्हणून जाहीर केलं. मी येथून लोकसभा लढवण्याच्या हायकमांडच्या निर्णयाचं स्वागत करते. आज मी अधिकृतरित्या पक्षात सहभागी झाले आहे, याचा मला अभिमान वाटतो आणि आनंदही होतो. मी एक योग्य कार्यकर्ता आणि विश्वासार्ह लोकसेवक असेल, धन्यवाद.” दरम्यान, कंगना हिमाचल प्रदेशातील मंडी येथील असून तिला तेथूनच उमेदवारी मिळाली आहे.
कंगनाने काही महिन्यांपूर्वीच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली होती. त्यामुळे ती लोकसभा लढवणार हे जवळपास निश्चितच झाले होते. कंगनावर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कंगणाच्या अभिनय क्षेत्रातील कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिने ‘क्वीन’, ‘तनू वेड्स मनू’ यासह अनेक चित्रपटात काम केले आहे. लवकरच तिचा ‘इमर्जन्सी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
भाजपकडून महाराष्ट्रात या तीन जागांसाठी उमेदवार जाहीर
यानुसार सोलापुरातून भाजपने काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या विरोधात राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे. भंडारा-गोंदियातून सुनील मेंढे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर गडचिरोली-चिमूर मतदारसंघासाठी अशोक नेते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अशोक नेते यांना भाजपकडून पुन्हा संधी देण्यात आली आहे. Kangana Ranaut Lok Sabha Elections|
हेही वाचा:
उत्तरप्रदेशच्या ‘या’ जागेवर भाजपनं बदलला उमेदवार; वाचा का केला बदल अन् कोणाला मिळाले तिकीट?