मुंबई – बीसीसीआयच्या भारतीय संघ निवड समितीवर भारताचे माजी कर्णधार व निवड समितीचे माजी अध्यक्ष के. श्रीकांत यांनी संताप व्यक्त केला आहे. तुमच्या जागी मी असतो तर लोकेश राहुलची यापूर्वीच हकालपट्टी केली असती, असे ते म्हणाले.
राहुलला गेल्या मौसमापासून सातत्याने अपयश येत आहे. त्यानेही यातून बाहेर पडण्यासाठी कोणतेही खास प्रयत्न केलेले दिसत नाहीत. मग अशा खेळाडूला संघात ठेवणे कितपत योग्य आहे, याचा विचार अता निवड समितीने केला पाहिजे. त्याने भरात असताना अनेक बलाढ्य संघांविरुद्ध मायदेशात तसेच त्यांच्या देशातही सरस कामगिरी केली आहे. मात्र, पूर्वपुण्याईवर कोणत्याही खेळाडूला खेळवले जाऊ नये असे माझे मत आहे. सध्या राहुलला अनेक पर्याय आहेत. शुभमन गिल, इशान किशनसारखे खेळाडू बाहेर बसवले जातात व राहुललाच वारंवार संधी दिली जाते, हा कोणता निकष आहे, असा सवालही त्यांनी केला.
यापूर्वी झालेल्या 10 कसोटीत त्याला एकही अर्धशतक फटकावता आलेले नाही. निवड समितीवर दबाव वाढल्यामुळे त्याचे उपकर्णधारपद काढून घेतले गेले पण त्याने काय साध्य होणार आहे. तो जर संघासाठी जबाबदारीने खेळत नसेल तर त्याला संघातून काढलेच पाहिजे त्यासाठी कोणाच्या आदेशाची वाट पाहात आहात का, अशी विचारणाही त्यांनी केली.
गिल व इशनला वेळेवर संधी मिळाली तरच ते प्रगल्भ होतील व अनुभवाने कोणत्याही देशाविरुद्ध कोणत्याही देशात व वातावरणात खेळू शकतील. मात्र, त्यांना जर संधीच दिली गेली नाही तर त्यांची गुणवत्ता वाया जाणार आहे. ते खरोखरच चांगले खेळाडू आहेत हे त्यांनी अनेकदा सिद्ध केले आहे मग त्यांना संघात घेण्यासाठी कोणाची वाट पाहात आहात, अशा शब्दात श्रीकांत यांनी निवड समितीला खडे बोल सुनावले आहेत.
KL Rahul : वारंवार अपयशी ठरूनही राहुलला संधी, व्यंकटेश प्रसाद संतापले, म्हणाले “गुणवान खेळाडूंवर…”
राहुलचा मीही चाहता आहे. त्याला रॉइस राहुल असेही मी म्हणतो पण कामगिरी व वैयक्तिक नाते दूर ठेवले पाहिजे. मी जर निवड समिताचा अध्यक्ष असतो तर त्याच्याशी बोलून त्याला संधी दिली असती मात्र, तरीही तो अपयशी ठरला असता तर त्याला संघातून बाहेर काढले असते. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर झाले पाहिजे व देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळले पाहिजे. आपल्या खेळातील चुका हेरून त्यात सुधारणा करत संघात थाटात पुनरागमन केले पाहिजे, असेही श्रीकांत यांनी सांगितले.