मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी एक राष्ट्र, एक निवडणूक या संकल्पनेचे कौतुक केले असून ही संकल्पना देशहिताची आहे असे त्यांनी म्हटले आहे. त्यातून निवडणूका घेण्याचा मोठा खर्च वाचणार आहे असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, साधारणपणे, तुम्हाला दिसेल की कोणत्या ना कोणत्या भागात 365 दिवस सतत कुठेना कुठे निवडणुका होत असतात. त्याचा परिणाम खर्चात वाढ होत असल्याचे ते म्हणाले. एकाचवेळी निवडणुकांमुळे खर्च कमी होईल, असे ते म्हणाले.
फडणवीस म्हणाले की देशात अनेक वेळा अनेक ठिकाणच्या निवडणूका होण्यामुळे प्रशासन पद्धतीत एकवाक्यता राहात नाही आणि देशात ज्या काहीं सुधारणा होत आहेत त्याच्या अंमलबजावणीचाहीं वेग मंदावतो. ते आज येथे पत्रकारांशी बोलत होते.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही या संकल्पनेचे स्वागत केले आहे. मात्र देशातल्या अन्य विरोधी पक्षांनी या संकल्पनेला तीव्र विरोध दर्शवला आहे.