मुंबई – जान्हवी कपूर आणि सारा अली खान या बेस्ट बडीज आहेत. गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीत त्यांच्या मैत्रीची वारंवार चर्चा होत असते. नुकत्याच दोघीही कॉफी विथ करण 7 मध्ये एकत्र आल्या होत्या जिथे त्यांनी त्यांच्या फ्रेंडशिप बाबत काही किस्से सांगितले. यादरम्यान त्यांनी केदारनाथ यात्रेबद्दल जे काही सांगितले ते आश्चर्यचकित नसून धक्कादायक होते. या प्रवासादरम्यान, जान्हवी आणि साराला मोठ्या अडीअडचणींचा सामना करावा लागला, त्या थंडीमुळे आजारी पडल्या आणि पैसे वाचवण्यासाठी त्यांनी काय केले हे जाणून तुम्ही थक्क व्हाल.
जान्हवी-साराने घेतला भयानक अनुभव
करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या टॉक शोमध्ये पोहोचलेल्या सारा आणि जान्हवीने त्यांच्या केदारनाथ ट्रिपबद्दल सांगितले की, त्यांना ही ट्रिप नेहमीच लक्षात राहील कारण यादरम्यान त्यांनी अक्षरशः मृत्यूला सामोरे जावे लागले,भैरवनाथाला जाताना दोघीनी नॉर्मल रस्ता सोडून ओबड धोबड रस्त्याची निवड केली. जो त्यांच्यासाठी जीवघेणा ठरू शकला असता. कारण पुढे जाऊन त्या दोघीही ८५ फूट दरीत अडकल्या. त्यावेळी त्याला मदत करणारे कोणी नव्हते, त्यांनी कसातरी आपला जीव वाचवला आणि पुढचा प्रवास सुरु ठेवला.
जान्हवी आणि सारा केदारनाथला गेल्यावर तिथे खूप थंडी होती. त्यावेळी तापमान उणे सात अंश सेल्सिअस होते. त्याच्याकडे भरपूर कपडे असले तरी त्यांना थंडी प्रचंड जाणवत होती. त्यातच हवामानातही बदल झाला आणि थंडी वाढतच गेली. पण त्यावेळी सारा अली खानने पैसे वाचवण्यासाठी नो हिटर रूम घेण्याची कल्पना दिली, जी जान्हवीने मान्य केली पण रूममध्ये गेल्यानंतरही त्यांना थंडी वाजत राहिली. खोलीतील बाथरूमची हालत देखील वाईट होती. असा थरारक किस्सा जान्हवी आणि सारने कॉफी विथ करणमध्ये सांगितला.