Jammu Kashmir Mehbooba Mufti : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी,’भाजपने देशभरात गोडसे तयार केले, तर गेल्या ७० वर्षांत आपण एकही गांधी निर्माण करू शकलो नाही. आज देशात कोणाचीही हत्या होत असून संपूर्ण देशात द्वेषाचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप मुफ्ती यांनी केला आहे.
भाजपच्या चित्रात रावणाचे चित्र म्हणूं मित्र I.N.D.I.A आघाडीचे राहुल गांधी यांना दाखवल्याचा निषेध पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी केला. याविषयी त्यांनी ‘आता कोणत्याही विरोधी पक्षाने हे केले असते तर भाजपने त्यांना पकडून तुरुंगात टाकले असते, पण ते स्वतः राहुल गांधींना विरोध करत आहेत.
पुढे जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की, राहुल गांधींना रावण म्हणणे भाजपची निराशा दर्शवते, सनातन धर्म हेच शिकवतो, सनातन धर्म लोकांवर प्रेम करायला शिकवतो पण भाजप या धर्माला बदनाम करण्यात कोणतीही कसर सोडत नाही.असा आरोप देखील यावेळी त्यांनी केला.
तसेच मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या, हे (सरकार) प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरले आहे. गरीब लोक विष प्राशन करण्याच्या टप्प्यावर पोहोचले आहेत. या स्थितीत ईडी हा भाजपचा उजवा हात बनला आहे. ते (सरकार) विरोधकांचा सामना करण्यात अपयशी ठरले आहे. सरकार ‘भारत’ आघाडीला घाबरत असून ईडीचा वापर करत आहे,” असेदेखील त्यांनी यावेळी म्हटले.