नवी दिल्ली : कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. आता घरी बसलेल्या नागरिकांच्या मनोरंजनासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या शनिवारी, २८ मार्चपासून दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर प्रचंड गाजलेल्या रामायण मालिकेचे पुनर्प्रक्षेपण करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली.
जनता की मांग पर कल शनिवार 28 मार्च से ‘रामायण’ का प्रसारण पुनः दूरदर्शन के नेशनल चैनल पर शुरू होगा। पहला एपिसोड सुबह 9.00 बजे और दूसरा एपिसोड रात 9.00 बजे होगा । @narendramodi
@PIBIndia@DDNational— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) March 27, 2020
रामायण मालिकेचा पहिला भाग शनिवारी सकाळी ९ वाजता आणि दुसरा भाग रात्री ९ वाजता दाखविण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे. ९० च्या दशकात रामायण ही मालिका दूरचित्रवाहिनीवर खूप गाजली होती. रामानंद सागर यांनी दिग्दर्शित केलेल्या या मालिकेला तेव्हा संपूर्ण देशात मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळी दर रविवारी सकाळी ही मालिका प्रसारित व्हायची.
काही दिवसांपू्र्वीच या मालिकेत राम, लक्ष्मण आणि सीता या व्यक्तिरेखा साकारणारे कलाकार सोनी टीव्हीवरच्या द कपिल शर्मा शोमध्ये आले होते. तेव्हापासूनच ही मालिका परत दूरदर्शनवर दाखवावी, अशी मागणी पुढे आली होती. ती आता पूर्ण झाली आहे.