आळंदी – प्राधान्य आळंदी शहर लवकरात लवकर करोनामुक्त करयचे आहे, यासाठी शहरातील नागरिकांनी देखील सहकार्य करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी केले.
आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर भूमरकर यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची कुर्डूवाडी नगरपरिषदेत बदली झाली. त्यामुळे त्यांच्या जागेवर वर्धा जिल्ह्यातील देवळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी मुख्याधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक सचिन गिलबिले आणि गटनेते पांडुरंग वहीले यांनी त्यांचे स्वागत केले, त्यावेळी ते जाधव बोलत होते.
याप्रसंगी आरोग्य समिती सभापती सागर भोसले, नगरसेविका रुक्मिणी कांबळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राम खरात, किशोर तरकासे, अशोक राजगुरू, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, विलास काटे, एम. डी. पाखरे, अर्जुन मेदनकर, दिनेश कुऱ्हाडे, बाळासाहेब पेठकर, प्रसाद बोराटे तसेच नगरपरिषदचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.