पुणे – धार्मिक तेढ संपवून राजकारण करायला पाहिजे मात्र, मोदींकडून ती अपेक्षा ठेवणे दुरापास्त आहे, अशी टीका बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. “सारथी’च्या आढावा बैठकीला उपस्थित राहण्याकरिता ते गुरुवारी (दि.20) पुण्यात आले होते. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
वडेट्टीवार म्हणाले, हा देश सर्व जाती धर्माचा आहे. सर्व जाती धर्मांचा आदर केला गेला पाहिजे. राम मंदिरासाठी ट्रस्ट होणे स्वागतार्ह आहे मात्र, मुस्लीम बांधवांनादेखील जागा देत असताना त्यासाठी ट्रस्ट स्थापन करायला हवा. धार्मिक तेढ संपवून राजकारण करायला पाहिजे मात्र, मोदींकडून ती अपेक्षा ठेवणे दुरापास्त आहे, असे ते म्हणाले.