मुंबई – बिल्किस बानो सामुहिक बलात्कार आणि तिच्या कुटुंबातील सात जणांच्या हत्या प्रकरणातील 11 दोषींच्या सुटकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) हे अद्याप का मौन बाळगून आहेत असा सवाल शिवसेनेने केला आहे.तरूंगातून सुटेलेल्या या 11 बलात्काऱ्यांचा सत्कार ही हिंदू संस्कृती आहे का, असा सवालही शिवसेनेने केला आहे.
सेनेचे मुखपत्रातील एका स्तंभात ही टिप्पणी करण्यात आली आहे. 2002 मध्ये गोध्रा ट्रेन जाळण्यात आल्याच्या प्रकारानंतर उसळलेल्या दंगलीतून पळून जात असताना बिल्किस बानो पाच महिन्यांची गरोदर होती तेव्हा तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला.
तिच्या कुटुंबातील सात जणांची हत्या करण्यात आली, त्यात तिची तीन वर्षांची मुलगी पण होती.या आरोपींची कारागृहातून नुकतीच सुटका करण्यात आली असून त्यांच्या उर्वरीत शिक्षेला माफी देण्यात आली आहे. हे आरोपी कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्यांचा पुष्पमाला घालून सत्कार करण्यात आला होता व त्यांना पेढेही भरवण्यात आले होते.
शिवसेनेच्या मुखपत्रातील या स्तंभात म्हटले आहे की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणतात की पंतप्रधान मोदी जे उपदेश करतात ते कधीच प्रत्यक्षात आचरणात आणत नाहीत. बिल्किस प्रकरणाने त्यांचा हा दावा योग्य असल्याचे सिद्ध केले आहे. पंतप्रधान मोदी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात महिला सक्षमीकरणाविषयी बोलले, तसेच महिलांचा सन्मान राखण्याचाहीं आग्रह त्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर बलात्कार प्रकरणातील दोषींना सोडण्यात आले हे आश्चर्यकारक आहे.
यावर पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गप्प का आहेत?असा सवालही त्यांनी केला आहे. बलात्काऱ्यांचा सत्कार ही हिंदू संस्कृती आहे का?असा सवालही यात करण्यात आला आहे. बिल्किस बानो मुस्लिम असल्याने आरोपींचा गुन्हा माफ केला जाऊ शकत नाही, असेही त्यात म्हटले आहे. हा हिंदू-मुस्लिम प्रश्न नसून हिंदुत्वाच्या आत्म्याचा आणि आपल्या महान संस्कृतीच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, असेहीे सेनेने म्हटले आहे. (Is honoring the accused in the Bilkis Bano case Hindu culture?, Shiv Sena’s Modi asked Shah)