अहमदाबाद – माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्यासह विराट कोहली व रोहित शर्मा यांना भारतीय क्रिकेटमध्ये सुपर थ्री असे संबोधले जाते. याच सुपर थ्री खेळाडूंचा माझ्यावर खूप प्रभाव पडला असून त्यामुळेच मला कोणत्याही संघाचे नेतृत्व कसे करायचे हे समजले, असे अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या याने म्हटले आहे.
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत पंड्याला अहमदाबाद संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर पंड्याने माध्यमांशी संवाद साधताना हे मत व्यक्त केले.
कोहलीकडून आक्रमकता, धोनीकडून शांतपणाने अचूक निर्णय घेणे व कोणत्या खेळाडूकडून कशी व कोणत्या क्षणी कामगिरी करून घेणे हे रोहितकडून शिकलो, असे पंड्या मंहणाला.