दुबई – विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर बेंगळुरूची (आरसीबी) अखेरची साखळी लढत दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. प्लेऑफमधील स्थान यापूर्वीच निश्चित झाल्यामुळे दिल्लीसह बेंगळुरूसाठीही ही लढत सोपी असेल.
चेन्नई सुपर किंग्ज व दिल्ली कॅपिटल्स यांना मागे टाकत क्रमवारीत पहिल्या दोन क्रमांकात स्थान मिळवण्याचीही संधी आहे. सध्या हेच दोन संघ पहिल्या दोन स्थानांवर असून त्यांच्यापैकी एका संघाला खाली ढकलून आपले स्थान पहिल्या दोन क्रमांकात आणण्यासाठी मोठ्या विजयाची गरज असून त्यासाठी कोहलीचा संघ निश्चितच प्रयत्न करेल.
बेंगळुरूचे 12 सामन्यांतून 16 गुण आहेत. दिल्ली (20) आणि चेन्नई (18) अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानी आहेत.