Virat Kohli on his two-month break from cricket : भारतीय फलंदाज विराट कोहली तब्बल दोन महिन्यांनंतर क्रिकेटच्या मैदानात परतला आहे. या वर्षी जानेवारीमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या घरच्या टी-20 मालिकेनंतर कोहली सार्वजनिक जीवनापासून दूर होता. आणि यादरम्यान कोहलीबद्दल अनेक प्रकारच्या गोष्टी, तर्क-वितर्क सुरू होत्या.
मात्र आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने एक मोठे गुपित उघड केले आहे. खरंतर विराटने काही काळापूर्वी क्रिकेटमधून सुमारे दोन महिन्यांसाठी ब्रेक घेतला होता. ब्रेक दरम्यान किंग कोहली कुठे होता हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे होते. आता विराटने स्वतः याचा खुलासा केला आहे. आयपीएल 2024 मध्ये आरसीबीच्या पहिल्या विजयानंतर, विराटने दोन महिन्यांच्या विश्रांतीदरम्यान आपला वेळ कुठे घालवला हे सांगितले.
याआधी कोहलीने वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भाग घेतला नव्हता. मात्र, त्यानंतर बातमी आली की, त्याची पत्नी अनुष्का शर्माने मुलाला जन्म दिला आहे. त्यानंतर कोहली दुस-यांदा बाप झाल्याचे उघड झाले आणि त्यामुळेच तो क्रिकेटपासून दूर होता.
पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यानंतर कोहली आपल्या ब्रेकबद्दल म्हणाला की, “आम्ही देशात नव्हतो. आम्ही अशा ठिकाणी होतो जिथे लोक आम्हाला ओळखत नव्हते. मी माझ्या कुटुंबासोबत दोन महिने सामान्य माणसाप्रमाणे वेळ घालवला. एक कुटुंब म्हणून आमच्यासाठी तो एक अप्रतिम अनुभव होता. माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळाल्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे रस्त्यावर चालणे, तुम्हाला कोणीही ओळखत नाही आणि सर्वसामान्यांसारखे दैनंदिन जीवन जगणे, हा एक विलक्षण अनुभव होता आणि असे वचन मी तिला ( पत्नी अनुष्काला) दिले होते.”
कोहलीसाठी कुटुंबापेक्षा मोठे काहीही नाही…
कोहली अशा खेळाडूंपैकी एक आहे जो आपल्या कुटुंबासाठी काहीही करू शकतो. क्रिकेटही कोहलीसाठी खूप काही आहे, पण तेवढेच तो आपल्या कुटुंबालाही प्राधान्य देतो. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी कोहली दोन महिने क्रिकेटपासून दूर राहिला. कोहली एका क्षणासाठीही आपल्या कुटुंबापासून दुरावू इच्छित नसल्याचे पंजाबविरुद्धच्या सामन्यानंतर दिसून आले. सामन्यामुळे खेळाडूंना त्यांच्या कुटुंबीयांशी जास्त वेळ बोलता येत नाही, त्यामुळे सामना संपल्यानंतर लगेचच कोहलीने अनुष्काला व्हिडिओ कॉल केला. यावेळी तो खूपच हसत हसत बोलताना दिसला. कोहलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी अंदाज लावला की कोहली अनुष्का आणि मुलीशी बोलत असावा. कोहलीची ही शैली चाहत्यांना खूप आवडली.
दरम्यान, विराट कोहलीचा 2024 टी-20 विश्वचषक संघात समावेश नसल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. अनेक माजी क्रिकेटपटूंनीही त्याला पाठिंबा दिला. कोहलीची संथ फलंदाजी त्याला T20 संघात निवड होण्यापासून रोखत असल्याचे बोलले जात होते. मात्र, किंग कोहलीला काहीही सिद्ध करण्याची गरज नसली, तरी टी-20 फॉरमॅटमध्ये आपल्या खेळात सातत्याने सुधारणा करण्याची गरज असल्याचे मत त्याने व्यक्त केले.
Virat Kohli : ‘सॅल्यूट टू कोहली”, Team India चा माजी निवडकर्ता झाला विराटचा चाहता…
कोहलीला वेगवान गोलंदाजांविरुद्ध हवेत शॉट्स खेळण्याबद्दल विचारले असता तो म्हणाला की, “तुम्हाला तुमच्या खेळाच्या शैलीमध्ये नेहमी काहीतरी नवीन जोडावे लागते. गोलंदाजांना माहित आहे की, मी कव्हर ड्राइव्ह चांगले खेळतो, त्यामुळे ते मला रिकाम्या जागी शॉट्स खेळून देत नाहीत. अशा परिस्थितीत, तुम्हाला एक रणनीती आखून काहीतरी नवीन शाॅटस जोडावे लागतात आणि आपल्या खेळात सतत सुधारणा करण्याचा प्रयत्न करावा लागतो.”