राजगुरूनगर -परप्रांतीय व राज्यातील मजूर कामगारांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी खेड पंचायत समितीने सुरू केलेल्या शेल्टर होम-निवारा शेडला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट देऊन परप्रांतीय मजुरांशी संवाद साधला.
जिल्ह्यातील परप्रांतीय मजूर, कामगार त्यांच्या मूळ गावी पायी चालत निघाले आहेत. यात कामगारासह त्याची बायका मुले यांचा सहभाग आहे. या कामगारांची जाण्यासाठीवाहने उपलब्ध करून त्यांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी मोफत बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
त्यासाठी राजगुरुनगर येथे खेड पंचायत समितीच्या माध्यमातून नीलकमल मंगल कार्यालयात शेल्टर होम-निवारा शेड उपलब्ध करून देण्यात आले आहे. शेल्टर होम च्या माध्यमातून सुमारे दोन हजार नागरिकांना पाठविण्यात आले आहे आतापर्यंत 23 एसटी बसच्या माध्यमातून पाठविण्यात आले आहे.