नवी मुंबई – मुंबईच्या महिला क्रिकेट पंच वृंदा राठी यांनी एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. येथील डॉ. डीय वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या भारत व इंग्लंड यांच्या महिला संघातील एकमेव कसोटी सामन्यात त्यांनी पंच म्हणून काम पाहिले. अशी कामगिरी करताना त्यांनी भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंच ठरण्याचा मान मिळवला.
भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासातील त्या पहिल्या महिला कसोटी पंच ठरल्या. त्याआधी, वृंदा यांनी २०१४ साली मुंबई क्रिकेट संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या पंच परिक्षेत उत्तीर्ण होण्याची कामगिरी केली. त्यानंतर २०१८ साली बीसीसीआयकडून आयोजित करण्यात आलेल्या पॅनल पंचांची परिक्षाही यशस्वीपणे उत्तीर्ण केली. त्यानंतर वृंदा यांनी आतापर्यंत १३ एकदिवसीय तसेच ४३ टी-२० सामन्यांत पंच म्हणून काम केले.
२०२० साली आयसीसी डेव्हलपमेंट पॅनल ऑफ अंपायर्समध्ये त्यांचा समावेश झाला. गेल्या वर्षी बर्मिंहॅमला झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही त्यांनी पंच म्हणून काम केले. यापूर्वीही नारायण जननी यांनी यंदाच्या वर्षी १० जानेवारीला वृंदा यांच्यासह पुरूषांच्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत पंच म्हणून काम केलेल्या पहिल्या महिला पंच ठरल्या. या दोघींनी रणजी करंडक स्पर्धेत गोवा आणि पॉंडिचेरी यांच्या सामन्यात पंच म्हणून काम पाहीले होते.
INDW vs ENGW Test Day 3 : भारतीय महिला संघाचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय, तिसऱ्याच दिवशी पॅकअप…
दक्षिण आफ्रिका येथे यंदाच्या मोसमात झालेल्या महिलांच्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतही वृंदा यांनी काम पाहीले होते. तसेच त्या महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात तसेच आशियाई क्रीडा क्रिकेट स्पर्धेतही महिला पंच म्हणून काम केले होते. अशी कामगिरी करणाऱ्या वृंदा देशाच्या पहिल्याच महिला पंचही ठरल्या होत्या.