INDW vs ENGW 3rd T20I : भारत आणि इंग्लंड महिला संघांमधील तीन सामन्यांची T20 मालिका रविवारी (10 डिसेंबर) संपली. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अखेरच्या सामन्यात टीम इंडियाने पाच विकेट्स राखून विजय मिळवला. अशाप्रकारे इंग्लंडने 2-1 अशा फरकाने मालिका जिंकली.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने मागील दोन सामन्यात पराभव पत्करला होता. टीम इंडियाने हा सामना जिंकून मालिकेचा समारोप केला आहे. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकमेव कसोटी सामना 14 डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे.
इंग्लंडची कर्णधार हीदर नाइटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचा संघ 20 षटकांत 126 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात भारताने 19 षटकांत 5 गडी गमावत 127 धावा करून सामना जिंकला. फलंदाजीत भारताकडून स्मृती मंधानाने सर्वाधिक 48 धावा केल्या तर गोलंदाजीत सायका इशाक आणि श्रेयंका पाटील यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. श्रेयंकाला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
For her vital contribution with the ball and taking 3️⃣ wickets, Shreyanka Patil is the Player of the Match 👏
Scorecard ▶️ https://t.co/k4PSsXN2T6 #TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/yiMPCa8iAH
— BCCI Women (@BCCIWomen) December 10, 2023
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो भारतीय गोलंदाजांनी पूर्णपणे चुकीचा सिद्ध केला. इंग्लंडसाठी कर्णधार हीदर नाइटने 52 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली, ज्यात 3 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. याशिवाय एमी जोन्सने 21 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 25 धावा केल्या. संघाचे एकूण 7 फलंदाज दुहेरी आकडाही पार करू शकले नाहीत, त्यापैकी 4 फलंदाज शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतले.
एक षटक राखत केली विजयाची नोंद…
इंग्लंडला 126 धावांवर रोखल्यानंतर टीम इंडियाने विजयासाठीचे आव्हान 1 षटक शिल्लक ठेवत पूर्ण केलं. दरम्यान, संघाची पहिली विकेट तिसऱ्याच षटकात शेफाली वर्माच्या रूपाने पडली, जी 6 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. त्यानंतर दुस-या विकेटसाठी स्मृती मंधाना आणि जेमिमाह रॉड्रिग्स यांनी 57 धावांची (55 चेंडू) भागीदारी केली, जी 12व्या षटकात जेमिमाहच्या विकेटसह संपली. जेमिमाने 33 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 29 धावा केल्या.
यानंतर दीप्ती शर्मा 16व्या षटकात 12 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली, अर्धशतकाकडे वाटचाल करणारी स्मृती मानधना 17व्या षटकात 48 धावा करून आणि 19व्या षटकात ऋचा घोष 02 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली.
मंधानाने संघासाठी 48 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली, ज्यात 5 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि अमनजोत कौर यांनी नाबाद राहून संघाला विजयाकडे नेले. कर्णधार हरमनप्रीतनं 06 आणि अमनजोत ही 10 धावा करून नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतली.