कोलकाता :– रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील एकदिवसीय मालिकेत निर्विवाद वर्चस्व राखलेल्या भारतीय संघाचेच पारडे आजपासून सुरू होत असलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेत जड राहणार आहे. या दोन संघात आज होत असलेली लढत जिंकून मालिकेत आघाडी घेण्यासाठी भारतीय संघ सज्ज असून, एकदिवसीय मालिका जिंकल्यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वासही दुणावला आहे.
भारत विरूध्द वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार असून तत्वूर्वी झालेला नाणेफेकीचा (टाॅस) कौल हा भारतीय संघाच्या बाजून लागला आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेताना वेस्ट इंडिज संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.
भारतीय संघ –
इशान किशन, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्य कुमार यादव, ऋषभ पंत, वेंकटेश अय्यर, दीपर चाहर, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, रवि बिश्नोई आणि युजवेंद्र चहल
वेस्ट इंडीज संघ –
ब्रँडन किंग, काइल मेयर्स, निकोलस पूरन ( यष्टीरक्षक), रोवमन पॉवेल, कायरान पोलार्ड (कर्णधार), रोस्टन चेस, रोमारियो शेफर्ड, अकिल होसेन, ओडियन स्मिथ, फॅबियन एलन, शेल्डन कॉट्रेल.
The #MenInMaroon playing XI for todays T20I vs @BCCI 🇮🇳 as @KieronPollard55 and the team continue their journey to the @T20WorldCup in 🇦🇺. #INDvsWI pic.twitter.com/XgNrF8EoC3
— Windies Cricket (@windiescricket) February 16, 2022
दरम्यान, भारतीय संघाकडे गोलंदाजीत बरेच पर्याय आहेत. आज फिरकीपटू रवी बिश्नोई भारताकडून पदार्पणाचा सामना खेळत आहे. रवी बिश्नोई हा 2020 च्या 19 वर्षांखालील संघातून थेट भारतीय संघाच्या सीनियर संघात पदार्पण करणारा पहिलाच खेळाडू ठरला. युझवेंद्र चहलने त्याला पदार्पणाची कॅप दिली.