अहमदाबाद – इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तीन कसोटी सामने खेळलेल्या अक्सर पटेलने एकाच मालिकेत 27 गडी बाद करत एकाच मालिकेत सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम साकार केला.
या मालिकेतील पहिल्या सामन्यात अक्सरचा समावेश निश्चित होता. मात्र, सामन्यापूर्वी त्याला दुखापत झाल्याने या सामन्यात तो खेळू शकला नाही. मात्र, दुसऱ्या सामन्यात त्याने पदार्पण करत इतिहास घडवला. चेन्नईतच झालेल्या दुसऱ्या कसोटीत पदार्पण करत इंग्लंडविरुद्धच्या 3 सामन्यात अक्सरने 6 डावात 27 बळी घेतले.
एका मालिकेत सर्वाधिक विकेट घेण्याचा दिलीप दोशी यांच्या विक्रमाशी अक्सरने बरोबरी केली. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1979 साली 6 कसोटी मालिकेत ही कामगिरी केली. पण अक्सरने फक्त 3 कसोटीत त्यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. अक्सरने पदार्पणाच्या मालिकेत सर्वाधिक बळी घेण्याचा श्रीलंकेच्या अजंथा मेंडिस याचा 26 बळींची कामगिरी मागे टाकली.