अहमदाबाद – शुक्रवारी झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 8 विकेटने दणदणीत पराभव केला आहे. त्यामुळे दुसरा सामना जिंकून विराटसेना मालिकेत पुनरागमन करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. दुसरीकडे कसोटी मालिकेप्रमाणेच इंग्लंडने टी-20 मध्येही चांगली सुरूवात केली. पण ही लय शेवटपर्यत कायम राखण्याचे त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यास थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा भारताच्या बाजूनं लागला आहे. ( India win the toss and elect to field ) कर्णधार विराट कोहली याने क्षेत्ररक्षण स्विकारताना इंग्लंड संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.