अहमदाबाद – भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामना आज(रविवारी) होणार आहे. याआधी शुक्रवारी झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 8 विकेटने दणदणीत पराभव केला आहे. त्यामुळे दुसऱ्या सामना जिंकून विराटसेना मालिकेत पुनरागमन करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.
दरम्यान, सामन्यापूर्वी आम्ही या विकेटवर सराव केला होता आणि फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीवर टर्न मिळाला. आमच्याकडे अजून ही योजना आहे की, जास्तीत जास्त फिरकी गोलंदाजांसह आम्ही मैदानावर येऊ. कारण ही आपली सर्वात मोठी शक्ती आहे आणि आम्ही त्यांचा सहकार्य करू, असे श्रेयस अय्यर म्हणाला.
आम्ही जास्तीत जास्त फिरकीपटूंसोबत खेळू आणि आमची रणनीती बदलणार नाही. कारण ती आमची सर्वात मोठी ताकद आहे. आम्हाला दृष्टिकोनात कोणताही प्रकारे बदलण्याची गरज नाही. आमच्या फलंदाजी क्रमवारीत मोठे फटके खेळणाऱ्यांची कमी नाही. आमच्याकडे एक रणनीती होती जी आपण पाळणे आवश्यक होते. कारण वर्ल्ड कपपूर्वी सर्व पर्याय पाहावे लागतील, जे आमच्यासाठी योग्य आहे. तसेच फलंदाजीच्या क्रमवारीबद्दल थोडं लवचिक राहावे लागेल.
मी माझी फलंदाजी बदलली नाही. हा फक्त विचार करण्यासारखा विषय होता आणि मी परिस्थितीनुसार फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, असे त्याने सांगितले.