लक्षवेधी
– चौथी कसोटी अखेर अनिर्णित
– बॉर्डर-गावसकर करंडक भारताकडेच राहिला
– चार सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी सरशी
– पहिल्या तिन कसोटींच्या खेळपट्टीवरून सुरु झालेला वाद संपला
– अहमदाबादच्या खेळपट्टीवर दोन्ही संघ समाधानी
– काही काळ आलेल्या पावसाच्या व्यत्ययाने निराशा
– भारतीय संघ डब्ल्युटीसीसाठी पात्र
अहमदाबाद – भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा व निर्णायक सामना अखेर अनिर्णित अवस्थेत संपला. अर्थात या मालिकेत पहिले दोन सामने जिंकल्यामुळे ही मालिका भारतीय संघाने 2-1 अशी जिंकली. इतकेच नव्हे तर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध येत्या जून महिन्यात होत असलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतही थाटात स्थान मिळवले.
या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या 480 धावांना चोख प्रत्यत्तर देताना भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावात 571 धावा उभारात 91 धावांची आघाडी घेतली होती. त्यावेळी चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात बिनबाद 3 धावा झाल्या होत्या व ते 88 धावांनी पिछाडीवर होते.
याच धावसंख्येवरून पुढे खेळ सुरु झ्लायावर मॅथ्यु कुहनेमनला 6 धावांवर रवीचंद्रन अश्विनने केले व भारतीयांच्या आशा उंचावल्या. मात्र, त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी संयमी फलंदाजी केली. त्यांनी भारताच्या फिरकी गोलंदाजीवर धोकादायक फटकबाजी टाळली. त्यांच्या ट्रॅव्हीस हेड व मान्रस लेबुशेन यांनी भारतीय गोलंदाजीचा टीच्चून सामना करताना आपापली अर्धशतक पूर्ण केली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी शतकी भागीदारी करताना संघाचे दीडशतक फलकावर लावले.
हेड शतकाच्या जवळ असताना अक्सर पटेलने त्याला बाद केले. त्याने आपल्या 90 धावांच्या खेळीत 163 चेंडूंचा सामना करताना 10 चौकार व 2 षटकार फटकावले. लेबुशेनने कर्णधार स्टीव्ह स्मिथसह संघाचे आणखी नुकसान होऊ दिले नाही. लेबुशेन 213 चेंडूत 7 चौकार फटकावून 63 धावांवर नाबाद राहिला तर, स्मिथने 59 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 10 धावांची खेळी केली.
याच दोन संघात 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका
(सर्व सामने दुपारी 1ः30 पासून)– पहिला सामना 17 मार्च, मुंबई
– दुसरा सामना 19 मार्च, विशाखापट्टणम
– तिसरा सामना 22 मार्च, चेन्नई
या सामन्याचा निकाल लागणार नाही हे लक्षात आल्यावर पंचांनी दोन्ही संघांच्या कर्णधारांशी चर्चा करत खेळ थांबवला व सामना अनिर्णित राहिल्याचे घोषित केले. पहिले दोन सामने भारताने जिंकले होते तर तिसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. चौथा सामना जरी अनिर्णित राहिला असला तरीही ही मालिका भारतीय संघाने 2-1 अशी जिंकली.
#NZvSL 1st Test : श्रीलंकेचा पराभव भारताच्या पथ्यावर; Sri Lanka जिंकली असती तर….
संक्षिप्त धावफलक –
ऑस्ट्रेलिया पहिला डाव – 480 धावा. भारत पहिला डाव – 571 धावा. ऑस्ट्रेलिया दुसरा डाव – 78.1 षटकांत 2 बाद 175 धावा. (ट्रॅव्हीस हेड 90, मार्नस लेबुशेन नाबाद 63. स्टीव्ही स्मिथ नाबाद 10, अक्सर पटेल 1-36, रवीचंद्रन अश्विन 1-58).