नाशिक – जगभरात मागील २ वर्षांपासून करोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. आता सध्या भारतामध्ये करोनाचं संकट कमी होतांना दिसून येत असले तरी करोना व्हायरसच्या या लढाईत लसीकरणाची मोठी भूमिका आहे.
करोना व्हायरसमुळे अनेक लोकांचे जीव गेल्यामुळे भारत सरकारकडून लसीकरणाच्या मोहिमेवर भर दिली आहे. असे असेल तरी अनेक लोकांना लसीकरणाबाबत संभ्रम आहे. अशातच वारकरी सांप्रदायातील प्रसिद्ध किर्तकनकार निवृत्तीमहाराज इंदुरीकर यांनी लसीकरणाबद्दल अजब गजब विधान केले आहे.
किर्तकनकार निवृत्तीमहाराज इंदुरीकर ते नाशिक येथील एका कीर्तनादरम्यान म्हणाले,’मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही. मला सांगा प्रत्येक माणसाची प्रतिकार शक्ती वेगळी आहे कि नाही. तसेच प्रत्येकाची मेंदूची क्षमता देखील वेगळी आहे.’
ते पुढे म्हणाले, ‘ज्याची त्याची प्रतिकार शक्ती वेगळी आहे हे कळायला नको का ? मी सगळीकडे फिरत असतो मला काही होत नाहीये मग लस घेऊन करायच काय ? करोनावर लस हे औषध नसून मन खंबीर ठेवायला हवे. मला सांगा १४ वर्षे प्रभू श्रीराम वनवासाला गेले होते तर सीतेला सोबत घेऊन गेले होते. इथे राम १४ दिवस क्वारंटाईन झाला तर सीतेने डोकवून पाहिला नाही.
दरम्यान,इंदुरीकर महाराज हे आपल्या विनोदी शैलीतून करणाऱ्या किर्तनासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. मात्र कीर्तन करतांना अनेकदा ते वादग्रस्त विधाने केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.