नवी दिल्ली – आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत राहणारे पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी भारताविरोधात अणुबॉम्बचा वापर करण्याची धमकी दिली आहे. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असून ते आसामपर्यंत पोहोचू शकतात, असे शेख रशीद यांनी म्हटले आहे. या अण्वस्त्र हल्ल्यात मुस्लिमांचे कोणतेही नुकसान होणार नसल्याचे शेख रशीद यांनी म्हटले आहे.
Sheikh Rasheed and his discoveries. This time he’s found a scientist who made a precision kafir bomb for India. pic.twitter.com/uozTBHPLM2
— Naila Inayat (@nailainayat) August 20, 2020
पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद म्हणाले की,’भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले तर ते रक्तरंजित शेवटचे युद्ध असेल.भारतीयांनो, बिर्लाजींच्या मंदिराची घंटा वाजणार नाही आणि भारतात गवतही उगणार नाही, असे म्हणत अहमद यांनी भारताला अणुबॉम्बची धमकी दिली आहे. ते पुढे म्हणाले,’मुस्लिमांचे प्राण वाचवताना आमचे शस्त्र आसामपर्यंत लक्ष्य करू शकते.’
शेख रशीद यांनी सांगितले, ‘पाकिस्तानकडे 125 ग्रॅम आणि 250 ग्रॅमचे अणुबॉम्ब आहेत जे विशिष्ट लक्ष्यावर मारा करू शकतात. पाकिस्तानकडे पाव आणि अर्धा पावाचे अणुबॉम्ब आहेत जे एखाद्या विशिष्ट भागाला लक्ष्य करू शकतात, हे भारताने ऐकून घ्यावे, असे पाकिस्तानच्या रेल्वेमंत्र्यांनी म्हटले आहे. शेख रशीद यांचे वक्तव्यही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या विधानांवरून भारतीय युजर्सकडून त्याची खिल्ली उडवली जात आहे.’