राजकोट :- भारत व श्रीलंका यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा व अखेरचा सामना आज होत आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला असल्याने मालिका कोण जिंकणार हे या सामन्यातील निकालाने स्पष्ट होणार आहे.
भारत व श्रीलंका यांच्यातील निर्णायक सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा (टाॅस) कौल हा भारतीय संघाच्या बाजूनं लागला आहे. (India won the toss and elected to bat first against Sri Lanka in the 3rd T20I) कर्णधार हार्दिक पांड्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
India won the toss and elected to bat first against Sri Lanka in the 3rd T20I.#INDvSL pic.twitter.com/5ue4NOK689
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) January 7, 2023
दरम्यान, यापूर्वी श्रीलंका संघाला भारतात भारतीय संघाला पराभूत करत एकदाही टी-20 मालिका जिंकता आलेली नाही. पहिला सामना त्यांनी गमावला मात्र, दुसरा सामना जिंकताना त्यांनी आपण आशिया करंडक विजेते असल्याचा प्रत्यय दिला. या लढतीत भारतीय गोलंदाज व फलंदाजांना साफ अपयश आले.
कर्णधार हार्दिक पंड्याचे नेतृत्व कुठेच दिसले नाही. तो फलंदाजातही अपयशी ठरला. तसेच भारताकडे असलेली भक्कम फलंदाजीही कोसळली. नवोदितांना संघात संधी मिळाल्यावरही त्यांना त्याचे सोने करता आले नाही. संघात प्रमुख खेळाडू नसताना या नवोदितांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची नामी संधी होती. ज्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली त्यांनाही सातत्य राखता आले नाही. इशान किशऩ व शुभमन गिल यांनाही संघातील जागा भक्कम करण्याच्या दृष्टीने जी जबाबदारी दाखवणे गरजेचे होते ते देखील घडले नाही. आता या निर्णायक लढतीत तरी भारतीय संघ अव्वल खेळ करेल व विजय मिळवेल अशी अपेक्षा आहे.
दुसरीकडे श्रीलंका संघाने पहिल्या सामन्यातील पराभवातून खूप काही शिकले. त्यांनी फलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांवर दडपण राखले तर गोलंदाजी करताना प्रत्येक फलंदाजाचा अभ्यास करुन त्यानूसार गोलंदाजी केली. त्यांचा कर्णधार दासुन शनाकाने आपला सर्व अनुभव पणाला लावला व अष्टपैलू कामगिरी करत विजय मिळवून दिला. आजही ते या सामन्यासह भारतात पहिल्यांदाच टी-20 मालिका जिंकण्यासाठी सज्ज बनले आहेत.