नवी दिल्ली – देश आता महामंदीच्या गर्तेत गेल्याचे स्पष्ट झाले आहे. सोमवारी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा जीडीपीचे आकडे अधिकृतपणे जाहीर झाले असून देशाचा विकास दर आता उणे 23.9 टक्के इतका झाला आहे. देशातील जीडीपी मध्ये झालेली ही घसरण अभुतपुर्व स्वरूपाची आहे. अशियातील अन्य देशांच्या तुलनेतही भारताची ही आर्थिक घसरण मोठ्या स्वरूपाची आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी भारताला ‘मोदी मेड डिजास्टर्स’मुळे त्रास होत असल्याची टीका केली आहे.
India is reeling under Modi-made disasters:
1. Historic GDP reduction -23.9%
2. Highest Unemployment in 45 yrs
3. 12 Crs job loss
4. Centre not paying States their GST dues
5. Globally highest COVID-19 daily cases and deaths
6. External aggression at our borders— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 2, 2020
दरम्यान, या आधीच्या तिमाहीत विकास दर घटून 3.1 टक्के इतका होता आता तर तो शुन्याच्याही खाली गेला आहे. देशात करोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा हा परिणाम मानला जात आहे. यापुढील तिमाहीतही हा दर असाच खाली राहण्याची शक्यता आहे कारण या तिमाहीत जुलै तर सप्टेंबर या महिन्यांच्या कालावधीतील आर्थिक उलाढालीची नोंद घेतली जाणार आहे. या अवधीतही करोनाच्या लॉकडाऊनचा मोठा विपरीत परिणाम झाला होता.
या तिमाहीत व्यापार, हॉटेल्स, परिवहन, दूरसंचार क्षेत्रात 47 टक्के इतकी घट झाली. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात 39.3 टक्के इतकी घट झाली, बांधकाम क्षेत्रात 50.3 टक्के इतकी घट नोंदवली गेली. तर खाण उद्योग क्षेत्रात 23. 3 टक्के इतकी घट नोंदवली गेली आहे. फक्त कृषी क्षेत्रात मात्र 3.4 टक्के इतकी वाढ नोंदवली गेली आहे त्यामुळे भारतीय अर्थकारणाला काडीचा तरी आधार मिळाला आहे.