नवी दिल्ली : टोळधाडीमुळे होणाऱ्या पिकांचे नुकसान रोखण्यासाठी भारताने ड्रोन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याद्वारे टोळधाडीवर किटकनाशकांची फवारणी करण्यात येणार आहे, असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.
टोळधाड आटोक्यात ठेवण्यात यापुर्वी भारतीय प्रशासनाला यश आले आहे. गहू आणि तेलबियांसारख्या पिकांच्या संरक्षणाचा प्रश्न पाकिस्तानातील टोळधाडीमुळे पुन्हा निर्माण झाला आहे. अशा हल्ल्यापासून वाचण्याची क्षमता ड्रोन, फवारे यांच्या खरेदीमुळे वाढणार आहे.
टोळ दिवसभरात 150 किमीचा प्रवास करू शकते. प्रौढ किटक दररोज त्याच्या वजनाएवढठे पीक फस्त करतो. तर लहान टोळधाड 35 हजार जण खाऊ शकतील एवढ्या अन्नाचा फडशा पाडतात. भारतीय उपखंडात अनेक देशात आणि पूर्व अफ्रिकेतील अनेक देशांत टोळधाडीमुळे अन्न तुटवडा भासतो. पाकिस्तानात दोन दशकातील सर्वात मोठी टोळधाड आलेली आहे. त्यामुळे तेथे आणीबाणी लागू करण्यात आली आहे.