भारत इलेक्ट्रॉनिक्सची स्थापना 1954 मध्ये बंगळुरू शहरात झाली. इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन इक्विपमेंटसचे उत्पादन एचएफ/डब्लू एचएफ, कम्युनिकेशन ट्रान्समीटर्स, मायक्रोव्हेव रेडिओ रिले आणि रडार या गोष्टींचे कंपनीने उत्पादन सुरु केले.
संरक्षण खात्याबरोबरच मनोरंजन क्षेत्रातील रेडिओ, टीव्हीसाठी या सगळ्यांची गरज होती. पण कंपनीने संरक्षण खात्याला लागणाऱ्या उपकरणांचे उत्पादन करण्याचे प्रामुख्याने ठरवले होते. 1985 ते 87 या काळात कंपनीने आपले समभाग भारताच्या राष्ट्रपतींच्या नावाने म्हणजेच सरकारच्या नावाने केले. 1987 साली त्यांनी भारतीय वेधशाळेला वादळाची पूर्वसूचना देणारे रडार बनवून दिले.
लष्करासाठी बहुलक्ष्यवेधी रडार तयार करून दिले. 1988 मध्ये दूरदर्शनसाठी 10 केडब्लू टीव्ही ट्रान्समीटर बनवून दिला.मेक इन इंडियाचे वाढत जाणारे यश, इस्त्रोची भरारी, वैद्यकीय क्षेत्रातील गरजा आणि संरक्षण क्षेत्रातील गरजा लक्षात घेतल्या तर या कंपनीला निदान आत्ता तरी म्हणावा असा स्पर्धक नाही.
अशा कंपनीचे शेअर दीर्घकाळासाठी घेऊन ठेवले तर भविष्यात चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. बाजार भांडवल 26,668.51 कोटी रुपये (शुक्रवारचा बंद) भाव- 109.45 रु. (शुक्रवारचा बंद)