ICC Cricket World Cup 2023: वर्ल्ड कप 2023 चा पहिला सेमीफायनल सामना भारत आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. जगभरातील करोडो चाहते या सामन्याची वाट पाहत आहेत. या सामन्याशी भारतीय चाहत्यांचे भावनिक नाते आहे, कारण 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे यावेळी टीम इंडिया न्यूझीलंडला हरवून त्या पराभवाचा बदला घेईल, अशी आशा चाहत्यांना आहे.
गेल्या 20 वर्षांच्या आयसीसी टूर्नामेंटमध्ये न्यूझीलंड संघाने टीम इंडियावर वर्चस्व गाजवले आहे, परंतु यावेळी टीम इंडिया उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करू शकते. याची अनेक कारणे आहेत. आम्ही तुम्हाला अशा 3 प्रमुख कारणे सांगतो, ज्याच्या आधारे टीम इंडिया उपांत्य फेरीच्या मॅचमध्ये न्यूझीलंडला पराभूत करू शकते.
1. टीम इंडियाचा जबरदस्त फॉर्म
सध्या टीम इंडिया जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. टीम इंडियाने विश्वचषकाच्या साखळी टप्प्यातील 8 सामने जवळपास एकतर्फी जिंकले आहेत. या विश्वचषकात भारताने सर्व 9 संघांना पराभूत केले असून याआधी आशिया कपमध्ये टीम इंडियाने एकतर्फी विजय मिळवला होता.या विश्वचषकात भारताने श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघांना 100 धावां करण्याचीही संधी दिली नाही. दुसरीकडे, या विश्वचषकाच्या सुरुवातीला न्यूझीलंडनेही उत्कृष्ट क्रिकेट खेळले, मात्र त्यानंतर त्यांना सलग 4 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे सध्या भारताचा फॉर्म न्यूझीलंडपेक्षा चांगला आहे.
2. टीम इंडियाचे टॉप-5 फलंदाज
या विश्वचषकात टीम इंडियाच्या टॉप-5 फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल या सर्व फलंदाजांनी विश्वचषकात खूप धावा केल्या आहेत.रोहित शर्माने 503 धावा केल्या आहेत, शुभमन गिलने 270 धावा केल्या आहेत, विराट कोहलीने 594 धावा (विश्वचषकातील सर्वोच्च), श्रेयस अय्यरने 421 धावा केल्या आहेत आणि केएल राहुलने 347 धावा केल्या आहेत. या पाच जणांनी मिळून आतापर्यंत 5 शतके आणि 15 अर्धशतकांच्या खेळी केल्या आहेत. टीम इंडियाचे फलंदाज उत्कृष्ट फॉर्ममध्ये असल्याचे सिद्ध करण्यासाठी हे आकडे पुरेसे आहेत.
3. टीम इंडियाचे टॉप-5 गोलंदाज
फलंदाजी ही नेहमीच टीम इंडियाची ताकद राहिली आहे, पण या विश्वचषकात टीम इंडियाची गोलंदाजी पाहिल्यानंतर जगभरातील क्रिकेट दिग्गजांचा असा विश्वास आहे की यावेळी भारताची गोलंदाजी ही जगातील सर्वात धोकादायक गोलंदाजी आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा हे पाच गोलंदाज विकेट घेणारे आहेत आणि ते एकट्याच्या बळावर कधीही सामन्याचेे चित्र बदलू शकतात.
या वर्ल्डकपमध्ये जसप्रीत बुमराहने 17, मोहम्मद शमीने 16, रवींद्र जडेजाने 16, कुलदीप यादवने 14 आणि मोहम्मद सिराजने 12 विकेट्स घेतल्या आहेत. म्हणजेच टीम इंडियाच्या या पाच गोलंदाजांनी मिळून आतापर्यंत एकूण 75 विकेट घेतल्या आहेत. यावरून असे दिसून येते की यावेळी टीम इंडिया कोणा एका गोलंदाजावर अवलंबून नसून सर्व गोलंदाजांवर अवलंबून आहे आणि न्यूझीलंडच्या फलंदाजांना त्यांचा सामना करणे सोपे जाणार नाही.