IND vs AUS World Cup Final 2023 : एकदिवसीय सामन्यांचा विश्वकरंडक जिंकल्यावर मायदेशी परतलेला ऑस्ट्रेलियाचा कर्णघधार पॅट कमिन्सने एका कार्यक्रमात या स्पर्धेबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. भारतीय संघ सातत्याने जिकंत होता. त्यांनी साखळी फेरीतही आम्हाला पराभूत केले होते. मात्र, अंतिम लढतीत मला त्यांच्या विराट कोहलीला बाद करण्यात यश आले व त्यावेळी अहमदाबादच्या मैदानात पसरलेली निरव शांतता अत्यंत आनंद देणारी ठरली, अशा शब्दात कमिन्सने आपल्या भावना व्यक्त करताना भारतीय चाहत्यांवर पुन्हा एकदा ताशेरे ओढले आहेत.
विश्वकरंडक स्पर्धेत यजमान भारतीय संघाने सलग दहा सामने जिंकले होते. तसेच त्यांच्याकडून आम्हाला साखळी फेरीतही पराभवाचा सामना करावा लागला होता. अंतिम लढतीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी भारतीय पत्रकारांनी मला भारतीय चाहत्यांच्या प्रचंड जल्लोषाचे दडपण येइल का असा प्रश्न विचारला होता. मात्र, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे बळी मिळवले तर मैदानावर पसरलेली शांतता पाहायला आवडेल असे मी म्हणालो होतो.
IND vs AUS 3rd T20 : टीम इंडियाच्या पराभवाची ‘ही’ आहेत 5 मोठी कारणे
तसेच प्रत्यक्ष सामन्यातही घडले. कोहलीला बाद करण्यात मला यश आले व संपूर्ण मैदान शांत झाले. त्यामुळेच खरेतर यजमान भारतीय संघावरचेच दडपण वाढले. कदाचित याच दडपणाखाली ते खेळले व त्यांनी सामना गमावला, असेही कमिन्स म्हणाला.
…त्याबाबत मी बोलणार नाही
मिशेल मार्शने विश्वकरंडकावर पाय ठेवल्याचा फोटो व्हायरल झाला होता. त्यावर बोलण्यास कमिन्सने स्पष्ट शब्दात नकार दिला. ड्रेसिंगरुममध्ये जे काही घडले त्याबाबत मी कोणतेही मत व्यक्त करणार नाही. यावर ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळच मत व्यक्त करु शकते. तसेच असे खरेच घडले असेल तर ते योग्य की अयोग्य यावरही मंडळ व्यक्त करेल तीच आमचीही बूमीका असेल, असेही कमिन्सने म्हटले आहे.