IND Vs ENG 4th Test (Ranchi) : – भारताविरुद्धचे सलग दोन कसोटी सामने गमावल्यानंतर इंग्लंड क्रिकेट संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ असा पिछाडीवर पडला आहे. रांची येथे चौथा कसोटी सामना खेळला जात आहे, जो जिंकून भारताला मालिका जिंकायची आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर बेन स्टोक्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक झाल्यानंतर काही वेळातच संघाला मोठा धक्का बसला. फिरकीपटू रेहान अहमद भारत सोडून मायदेशी परतला आहे. वैयक्तिक कारणाने मायदेशी परतण्याचा त्याने निर्णय घेतला असाल तरीही त्यामुळे इंग्लंडला चांगलाच फटका बसला आहे.
संघाचा फिरकी गोलंदाज रेहानने या मालिकेतून आपले नाव मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्याच्या मायदेशी परतल्याची माहिती इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाला दिली. नाणेफेकीनंतर सांगण्यात आले की वैयक्तिक कारणांमुळे रेहानला भारत सोडून इंग्लंडला जावे लागले. या मालिकेतील शेवटच्या सामन्यातही रेहान संघात पुनरागमन करणार नाही. त्याच्या जागी कोणत्याही खेळाडूचा समावेश करण्यात आलेला नाही, असेही इंग्लंड मंडळाने सांगितले आहे.
IND vs ENG 4th Test : ‘जो रूट’कडून कसोटी क्रिकेटमधील ‘स्टीव्ह स्मिथ’चा मोठा विक्रम मोडीत….
या मालिकेत पिछाडीवर असलेल्या इंग्लंडला चौथा कसोटी सामना जिंकत मालिकेत बरोबरी करण्याची नामी संधी होती मात्र, रेहनाच्या माघारीने त्यांच्या फिरकी गोलंदाजीची बाजू कमकुवत ठऱणार आहे. त्यातच रांची येथे सुरु असलेल्या या सामन्यासाठी तयार करण्यात आलेली खेळपट्टी फिरकीला साथ देणार असे वर्तवण्यात आल्याने इंग्लंडच्या चिंतेत भर पडली आहे.