Saurashtra Cricket Association Stadium – भारत व इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना राजकोट येथे होणार आहे. महत्वाचे म्हणजे या मैदानाचे नाव या सामन्यापूर्वीच बदलले जाणार आहे. तसे पाहिले तर या मैदानाला काही नावच नव्हते. मुळ स्टेडियम सौराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या नावानेच ओळखले जात होते. मात्र आता या स्टेडियमचे नामकरण निरंजन शहा स्टेडियम असे केले जाणार आहे.
शहा हे बीसीसीआयचे माजी सचिव होते. तिसरा कसोटी सामना याच मैदानावर येत्या १५ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत होत आहे. शहा यांनी बीसीसीआयचे क्रिकेट प्रशासक म्हणूनही काम पाहिले आहे. ते स्वतः एक क्रिकेटपटू होते व त्यांनी १९६५ ते १९७५ या कालावधी सौराष्ट्रकडून प्रथम दर्जाचे क्रिकेटही खेळले होते.
दरम्यान, विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने इंग्लंडचा १०६ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने मालिकेत1-1 अशी बरोबरी साधली. इंग्लंडने पहिला कसोटी सामना 28 धावांनी जिंकला होता.
दुसऱ्या कसोटीत जसप्रीत बुमराह, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल आणि रविचंद्रन अश्विन यांनी भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. जैस्वालने पहिल्या डावात 209 धावा केल्या. तर, बुमराहने सामन्यात एकूण 9 विकेट घेतल्या. जसप्रीत हा सामन्याचा मानकरी ठरला. दुसरा कसोटी सामना चौथ्या दिवशीच संपला. या सामन्यात 399 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ केवळ 292 धावांवरच मर्यादित राहिला.