मुंबई – पक्षांतर कसे करायचे याबद्दलची एक बेकायदेशीर बाराखडी प्रस्थापित करणारा निर्णय म्हणून राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाकडे आपल्याला बघायला पाहिजे. ही जी कायदेविरोधी प्रवृत्ती तयार होत आहे, त्याबद्दल या जनतेच्या न्यायालयात बोलले गेले पाहिजे, असे मत वकिल असीम सरोदे यांनी व्यक्त केले आहे.
अॅड. सरोदे पुढे बोलताना म्हणाले की, कायदा लोकांसाठी असेल तर तो लोकांमध्ये बोलला पाहिजे. आज जनता न्यायालयात वेगवेगळ्या बाजू नाहीत, केवळ सत्याची बाजू आहे. आपण अपात्रता सुनावणीच्या कायदा आणि झालेला न्याय आणि अन्याय हे समजून घेतले पाहिजे.
निकालाचे विश्लेषण करणे हे कायद्याचे उल्लंघण होत नाही, न्यायालयाच्या निकालाची चर्चा करा, पण चुकीचे शब्द वापरले जाऊ नये. पक्षातंर कसे करायचे, याची बाराखडी म्हणजेच राहुल नार्वेकरांच्या निकाल आहे. कायद्याविरोधी प्रवृत्ती तयार केली जात आहे. त्याविरोधात बोलणे गरजेचे आहे.
राज्यपालांची भूमिका संशयास्पद
अॅड. सरोदे पुढे म्हणाले की, निवडून आलेले आमदार हे विधिमंडळ पक्ष हे व्हीप ठरवू शकत नाही, फुटलेल्या गटाला तो अधिकार नाही. ११२ परीच्छेद मध्ये म्हटले की, अजय चौधरी यांची नेता म्हणून नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने योग्य केले आहे. २०६ब मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे की, वाजवी कालावधीत नार्वेकरांनी निर्णय केला पाहिजे होता. राहुल नार्वेकरांना पुढे करून ज्यांनी राजकारण केले त्यांनी लोकशाहीची हत्या केली असे असीम सरोदे म्हणाले. कोर्टाने दिलेल्या निर्णयावर प्रिन्सिपलवर अध्यक्षांनी निर्णय द्यावा. पण तसे झालेच नाही. राज्यपालांची भूमिका संशयास्पद होती. कोर्टाने देखील नाराजी व्यक्त केली होती.